एक आश्चर्यकारच घटना समोर आली आहे. एका तरुणीचं अपहरण करून तिची हत्या करण्यात आली. त्यांनतर तरुणीच्या वडिलांनी पोलिसात तक्रार नोंदवली. आणि तक्रारीवरून आरोपींना अटक देखील करण्यात आली. तरुणीच्या वडिलांनी आपली मुलगी समजून अंत्यसंस्कार केले तीच मुलगी काही दिवसांनी घरी परत आली. आपली मुलगी घरी परत आली म्हणून घरचे आनंदी होते. परंतु जिला आपली मुलगी समजून अंत्यसंस्कार केला होता ती मुलगी कोण? असे प्रश्न आता पोलीस आणि मुलीचे पालकांना पडले आहेत.
नेमकं प्रकरण काय आहे?
एक आठवड्यांपूर्वी बुंदेलखंड एक्सप्रेसवे हमीरपुर जिल्ह्यातील जरिया भागात याच एक्सप्रेसवेच्या खाली एका मुलीचा मृतदेह सापडला होता. पोलिसांना यासंदर्भात स्थानिकांनी तक्रार केली. त्यांनतर पोलिसांनी या मुलीचे वर्णन आजूबाजूच्या पोलीस ठाण्यात पाठवले. त्यांनतर मुस्कुरा पोलिस ठाण्याच्या हद्दीतील बिहुनी गावातील रहिवासी मलखान प्रजापती पुढे आले आणि त्यांनी या मृतदेहाची ओळख पटवून ती त्यांची मुलगी असल्याचे सांगितले. मुलीचे नाव शिवानी प्रजापती असल्याचे पोलिसांना सांगितले. त्यानंतर पोलिसांनी पंचनामा करून हा मृतदेह पालकांना सोपवला. मलखान यांनी त्यांच्या मुलीवर अंत्यसंस्कार केला आहे.
मालखान प्रजापती यांनी पोलीस ठाण्यात तक्रार दाखल केली. आणि त्यांच्या गावातील तरुण मनोज अनुरागी आणि त्याचे वडील महेश अनुरागी यांच्यावर मुलीच्या अपहरणाचा गुन्हा दाखल करण्यात आला. पोलिसांनी आरोपींचा शोध सुरु केला. परंतु काही दिवसांनी शिवानी प्रजापती जिवंत असल्याचे समाजले. त्यानंतर १७ वर्षीय शिवानीला जालौन येथील गोहांड परिसरातून ताब्यात घेण्यात आले. शिवानीला शोधून तिच्या घरी सुखरूप पाठवले. शिवानी सापडताच गावात हाहाकार उडाला. कारण जिचा अंत्यसंस्कार वडिलांनी केला ती नेमकी कोण? असा प्रश्न सगळ्यांनाच पडला आहे.
मग मृत तरुणी कोण?
बुंदेलखंड एक्सप्रेसवेच्या जवळ मिळालेल्या मृत तरुणीचे वय २५ वर्षे असल्याचा अंदाज पोलिसांनी वर्तवला आहे. पोलिसांना संशय आहे की ही तरुणी दुसऱ्या जिल्ह्यातील असणार आहे. आता पोलीस तपास करीत आहेत आणि पुरावे जमा करीत आहेत. पोलिसांना या घटनेबद्दल कोणतीही माहिती मिळालेली नाही आहे. पोलीस देखील याचा तपास करत आहेत.