
११ जून २०२५
यवतमाळच्या महागाव तालुक्यातील वेणी धरणाच्या बॅक वॉटर जवळ असलेल्या धारकान्हा शेत शिवारात शंभर जनावरे मृत्यूमुखी पडल्याची घटना उघडकीस आली आहे.या घटनेमुळे एकच खळबळ उडाली आहे.
मिळालेल्या माहितीनुसार , मंगळवारी सायंकाळी वादळी वाऱ्यासह पाऊस आला होता, त्यावेळी वीज पडून धरणाच्या बॅकवॉटर जवळ चरत असलेल्या जनावरांवर वीज पडून त्यांचा मृत्यू झाल्याचा अंदाज व्यक्त केला जात आहे.
महसूल प्रशासन घटनास्थळी पोहोचले असून गावातील जनावरे रात्री घरी न आल्याने आज सकाळी शेतकरी धरणाच्या दिशेने गेले असता अनेक जनावर मृत्युमुखी पडल्याचे आढळून आले.
धारकान्हा गावातील शेतकऱ्यांचे कोट्यवधी रूपयाचे नुकसान झाले आहे. दरम्यान जनावरांचा मृत्यू कशामुळे झालाय हे शवविच्छेदन केल्यानंतर समजणार आहे. महागाव तालुक्यात 100 जनावरं दगावल्यानं खळबळ उडालीय.
वेणी धरणाच्या बॅक वॉटर जवळ असलेल्या धारकान्हा शेत शिवारात ही जनावरं दगावल्याची घटना घडली. वीज पडून जनावरांचा मृत्यू झाल्याचा अंदाज आहे. मात्र बॅकवॉटरमध्ये काही मिसळण्यात आलं होतं का? यादृष्टीनंही तपास केला जातोय.
या घटनेमुळे धारकान्हा गावातील शेतकऱ्यांचं मोठं नुकसान झालंय. दरम्यान जनावरांचा मृत्यू नेमका कशामुळे झालाय, हे शवविच्छेदन केल्यानंतरच समोर येणार आहे.
Copyright ©2025 Bhramar