''या'' कारणावरून महाविकास आघाडीत मोठी फूट ?  नेमकं काय घडतंय ?
''या'' कारणावरून महाविकास आघाडीत मोठी फूट ? नेमकं काय घडतंय ?
img
Nandini khandare More

सध्या राजकरणात मोठ्या घडामोडी घडत असून राजकारणात आता मोठं काहीतरी घडणार असलायची शक्यता आहे. आधीच उबाठा गटाचे ६ खासदारांनी मोठी बंडखोरी केली असून ठाकरे गटात मोठं वादळ निर्माण झालं आहे. दरम्यान त्यांनतर अनेक हालचालींना वेग आलेला आहे. 

दरम्यान आता महाविकास आघाडीत मोठी फूट पडण्याची शक्यता आहे. शरद पवार एनडीएमध्ये दाखल होण्याच्या चर्चा आहेत. तश्या हालचाली सुरू आहेत. त्यातच डीलिमिटेशन बिलावरून महाविकास आघाडीत मोठी फूट पडली. मतदारसंघाच्या पुनर्रचना विधेयावर सुप्रिया सुळे यांनी म्हटले की, ठाकरेंची शिवसेना, डीएमके आणि काँग्रेसचा होकार आहे. 

शरद पवार यांनी या बिलाला पाठिंबा दिला. ज्यामुळे ठाकरे गट भडकला आहे. यावरून आता संजय राऊत यांनी संताप व्यक्त केला. संजय राऊत यांनी म्हटले की, डीलिमिटेशन बिलाला आम्ही राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष म्हणजे शरद पवारांचा पक्ष आम्ही या बिलाला पाठिंबा देत आहोत, हे पूर्णपणे चुकीचे आहे. आम्ही डिलिमीटेशन बिलाला पाठिंबा देणार नाहीत. सुप्रिया सुळे पत्रकार परिषद घेतील.राष्ट्रवादी काँग्रेस शरद पवार पक्षाचे आमदार खासदार चालले या सर्व अफवा आहेत.

जयंत पाटील, सुनील तटकरे आणि प्रफुल पटेल यांच्या मुख्यमंत्र्यांच्या भेटीवर बोलताना संजय राऊत म्हणाले की, मला जेवढे माहिती आहे, त्यानुसार जयंत पाटील यांच्या मतदार संघातील नगराध्यक्षाला अत्यंत बेकायदेशीरपणे अपात्र ठरवण्यात आले. ही लोकशाहीसाठी अत्यंत गंभीर गोष्ट आहे. माझ्या माहितीनुसार, ते त्या विषयावरच मुख्यमंत्र्यांना भेटण्यासाठी गेले होते.

त्याविषयावर ते बोलायला गेले होते आणि त्यांनी तक्रार केली. जयंत पाटील हे महत्वाचे नेते आहेत. महाविकास आघाडीतील महत्वाचे नेते आहेत. हे जाणीवपूर्वक पसरवले जात आहे. भारतीय जनता पक्षाला आणि शिंदे गटाला काही काम राहिले नाही. मुळ प्रश्नापासून लक्ष विचलित करण्यासाठी हे केले जात आहे. माझी सुप्रिया सुळे यांच्यासोबत सविस्तर चर्चा झाली आहे.

हे जे बिल आहे, ते या अधिवेशनात येणार की नाही याबाबत काही ठरले नाही. ते ज्यावेळी बिल येईल, त्यावेळी आम्ही सर्वजण बसून यावर निर्णय घेऊ. मागच्या अधिवेशनात सरकारसोबत याबाबत चर्चा झाली होती. आमच्या पक्षाकडून त्यावेळी अरविंद सावंत हे बैठकीला उपस्थित होते. जो काही आहे, तो सर्वजळ मिळू घेतील. आम्ही डिलिमीटेशन विधेयकाला पाठिंबा देणार हे चुकीचे आहे. सोनम वांगचुक यांच्या उपोषण देशापुढील गंभीर प्रश्न आहे.

इतर बातम्या
Join Whatsapp Group