लालबाग राजाच्या दर्शनासाठी गेला  पण पुन्हा परतलाच नाही ! दर्शनासाठी रांगेत उभा राहिला अन ...
लालबाग राजाच्या दर्शनासाठी गेला पण पुन्हा परतलाच नाही ! दर्शनासाठी रांगेत उभा राहिला अन ...
img
Nandini khandare More

संपूर्ण राज्यात गणेशोत्सवाचा उत्साह आणि जल्लोष दिसून येत आहे.  दरम्यान मुंबईतून एक दुर्दैवी बातमी समोर आली आहे. मुंबईतील लालबागच्या राजाच्या दर्शनासाठी भक्त लांबून येतात आणि तासंतास लांब रांगेत उभे राहतात. याच दरम्यान आता एक दुर्दैवी आणि खळबळजनक बातमी समोर आली आहे. 

समोर येत असलेल्या माहितीनुसार, जळगाव येथील एक तरुण राजाच्या दर्शनासाठी मुंबईत आला. पण तो पुन्हा जळगाव येथे परतलाच नाही. आता बाप्पाचं दर्शन होणार म्हणून आनंदी असलेल्या तरुणाचं हृदयविकाराने निधन झालं. तरुणाच्या निधनानंतर सर्वत्र खळबळ उडाली आणि अनेकांना मोठा धक्का बसला.

राजाच्या दर्शनासाठी आलेल्या तरुणाचं नाल जयदीप मेघराज नेमाडे असं असून, त्याचं निधन झालं आहे. जयदीप फक्त 25 वर्षांचा होता. समोर येत असलेल्या माहितीनुसार, जयदीप एक ट्रान्सपोर्ट व्यवसायिक होता. गणेशोत्सवात मुंबई येथे लालबागच्या राजाच्या दर्शनासाठी गेला होता. गुरुवारी रात्री तो दर्शनरांगेत असतानाच त्याला अस्वस्थ वाटू लागलं.

जयदीप याची प्रकृती खालावल्यानंतर मंदिरातील अधिकारी, कर्मचाऱ्यांनी तरुणाला तात्काळ रुग्णालयात दाखल केलं. पण तो पर्यंत उशीर झालेला. जयदीप याला रुग्णालयात दाखल केल्यानंतर डॉक्टरांनी त्याला मृत घोषित केलं. जयदीप यांच्या निधनाची  माहिती मिळाल्यानंतर त्याच्या कुटुंबियांवर दुखःचा डोंगर कोसळला.

सांगायचं झालं तर, लालबागच्या राजाच्या दर्शनासाठी भक्तांची कायम मोठी गर्दी जमलेली असते. काही केल्या ही गर्दी कमी होताना दिसत नाही. यासाठी मोठ्या योजना देखील राबवल्या जातात. एवढंच नाही तर, पोलीस बंदोबस्त देखील मोठ्या प्रमाणावर असतो. सोशल मीडियावर गर्दीचे फोटे आणि व्हिडीओ देखील व्हायरल होत असतात.  गणेशोत्सवाच्या शेवटच्या  दिवसापर्यंत भक्तांची गर्दी असते. एवढंच नाही तर, विसर्जनासाठी देखील लोक मोठी गर्दी करतात.
इतर बातम्या
Join Whatsapp Group