शेतकऱ्यांसाठी चिंताजनक ! बळीराजाचा खर्च वाढणार, रशियाकडून सवलतीच्या दरात खत देणं बंद
शेतकऱ्यांसाठी चिंताजनक ! बळीराजाचा खर्च वाढणार, रशियाकडून सवलतीच्या दरात खत देणं बंद
img
Dipali Ghadwaje
महाराष्ट्रासहित देशभरातील शेतकऱ्यांसाठी एक अतिशय महत्त्वाची आणि थोडीशी चिंताजनक बातमी समोर आली आहे. ती म्हणजे संपूर्ण देशात आगामी काळात खतांच्या किमतीत वाढ होण्याची शक्यता आहे. यामुळे शेतकऱ्यांचा उत्पादन खर्च मोठ्या प्रमाणात वाढणार असे सांगितले जात असे. एका वृत्त संस्थेने याबाबतचे वृत्त दिले आहे.

जागतिक खत पुरवठ्यात अडचणी निर्माण झाल्यानं रशियानं भारताला डायअमोनियम फॉस्फेटसारखी खते सवलतीच्या दरात देणं बंद केलं आहे. त्यामुळं खते महागण्याची शक्यता आहे. याचा भार शेतकऱ्यांवर पडणार असून त्यांचा खर्च वाढणार आहे. 

गेल्या वर्षी रशिया हा भारताला सर्वात मोठा खतांचा पुरवठा करणारा देश बनला होता. हा पुरवठा सवलतीच्या दरात केला जात होता. मात्र, आता बाजारपेठेतील किमतीप्रमाणे खतांचा पुरवठा करण्याची भूमिका रशियाच्या कंपन्यांनी घेतली आहे. त्यामुळं भारतात खतांच्या किंमती वाढण्याची शक्यता आहे. त्यामुळं शेतकऱ्यांचा खर्च वाढू शकतो. दरम्यान, जागतिक स्तरावरील वाढत्या किमतीमुळे चीननेही खतांची निर्यात कमी केली.
 
रशियाकडून भारताला मोठ्या प्रमाणात खतांची निर्यात
मागील वर्षी रशियाने भारताला मोठ्या प्रमाणात खतांची विक्री केली होती. त्यामुळं खतांच्या निर्यातीमध्ये चीन, इजिप्त, जॉर्डन, संयुक्त अरब अमिराती या देशांचा वाटा कमी झाला होता. सवलतीच्या दरात रशियाकडून खतांचा पुरवठा केला जात होता. त्यामुळं भारतात मोठ्या प्रमाणात खतांची आयात झाली होती. मात्र, आता सवलतीच्या दरात खतांची आयात होणार नसल्यानं भारताचा खर्च वाढू शकतो. परणामी खतांची किंमती वाढून शेतकऱ्यांना आर्थिक फटका बसण्याची शक्यता वर्तवली जात आहे. 

भारताचा आयात खर्च वाढू शकतो
रशियन कंपन्यांनी बाजारातील किमतींनुसार खते देण्याच्या निर्णयामुळे भारताचा आयात खर्च वाढू शकतो. त्यामुळं जागतिक किमतीत वाढ होत असताना सबसिडीचा भार देखील वाढू शकतो. जागतिक बाजारात खतांची किंमती वाढ असल्यानं चीनने देखील परदेशातील खतांची विक्री कमी करण्याचा निर्णय घेतला आहे.  
 

इतर बातम्या
Join Whatsapp Group