आठ ते दहा दिवस धो धो कोसळलेल्या पावसामुळे शेतकऱ्यांचे प्रचंड नुकसान झाले. उभं पिक पाण्याखाली गेल्यामुळे बळीराजा चिंतेत होता. शेतकऱ्यांकडून मदतीचा हात मिळेल, या आशेवर असणाऱ्यांना धक्का बसला आहे.
कारण सरकारकडून नुकसान भरपाईच्या नियमात पुन्हा एकदा बदल करण्यात आला आहे. कमाल तीन हेक्टरऐवजी दोन हेक्टरपर्यंतच मदत देण्याचा निर्णय घेतला आहे.
शेतीच्या नुकसानीचे पंचनामे सुरू झाले आहेत, पण सरकारच्या या निर्णयाचा फटका अनेक शेतकऱ्यांना बसणार आहे.
अवकाळी पाऊस, अतिवृष्टी, पुराने झालेल्या शेतपिकांच्या नुकसान भरपाईच्या रकमेत बदल करण्यात आला आहे. त्याशिवाय कमाल तीन हेक्टरऐवजी आता दोन हेक्टरपर्यंतच मदत देण्यात येणार आहे.
राज्य सरकारने याबाबतचा निर्णय घेतला आहे. २७ मे २०२३ रोजी तत्कालीन सरकारने सर्वात आधी नियम बदलून दोन हेक्टरपर्यंतच मदत देण्याचं जाहीर केले होते.
एकनाथ शिंदे यांनी सत्तेत आल्यावर २०२४ मध्ये मदतीचे दर आणि हेक्टरची कमाल मर्यादा यात वाढ केली होती. पण तो निर्णय रद्द करून आता पुन्हा २७ मार्च २०२३ च्या निर्णयानुसार मदत केली जाणार असल्याने शेतकऱ्यांना याचा फटका बसणार आहे.