दुर्दैवी !
दुर्दैवी ! "या" ठिकाणी मध्यरात्री भीषण अपघातात ६ जणांचा जागीच मृत्यू , महामार्गावर मृतदेहांचा खच
img
Dipali Ghadwaje
बीड जिल्ह्यातून जाणाऱ्या धुळे-सोलापूर राष्ट्रीय महामार्गावर गेवराई शहराजवळ मध्यरात्री झालेल्या एका थरारक अपघातात सहा जणांना आपला जीव गमवावा लागला आहे. या भीषण घटनेने संपूर्ण गेवराई तालुक्यावर शोककळा पसरली असून, स्थानिकांमध्ये भीतीचे वातावरण निर्माण झाले आहे.


याबाबत मिळालेल्या माहितीनुसार , सोमवारी रात्री उशिरा बीडमधील गेवराई येथे हा भयंकर अपघात झाला. या अपघातात सहा जणांचा जागीच मृत्यू झाला. गेवराई येथील छत्रपती संभाजी महाराज चौकाजवळ झालेला हा अपघात इतका भयंकर होता की रस्त्यावर मृतदेहांचा खच पडला... जिकडे तिकडे रक्त होतं.  

बीड जिल्ह्यातून जाणाऱ्या धुळे-सोलापूर राष्ट्रीय महामार्गावरील गढी पुलावर भीषण अपघात झाला. बाळू आतकरे, मनोज करांडे, कृष्णा जाधव, दीपक सरोया, भागवत परळकर आणि सचिन ननवरे यांचा मृत्यू झाला आहे. सहा जणांच्या अपघाती निधनाने गेवराईवर शोककळा पसरली आहे.

मिळालेल्या प्राथमिक माहितीनुसार, गेवराई येथील काही नागरिकांची चारचाकी गाडी तांत्रिक बिघाडामुळे गढी परिसरात बंद पडली होती. या गाडीला आणण्यासाठी गेलेल्या सहा जणांना भरधाव वेगाने येणाऱ्या कंटेनरने जोरदार धडक दिली. या धडकेत गाडीचा पूर्णपणे चक्काचूर झाला आणि सर्व सहा जणांचा जागीच मृत्यू झाला.

अपघात इतका भीषण होता की, घटनास्थळावर जिकडे तिकडे रक्त होतं. घटनेची माहिती मिळताच स्थानिक पोलीस आणि आपत्कालीन पथकाने तातडीने घटनास्थळ गाठले. मृतदेहांना पोस्टमार्टमसाठी स्थानिक रुग्णालयात हलवण्यात आले आहे.

दरम्यान, अपघाताला कारणीभूत ठरलेला कंटेनर चालक घटनास्थळावरून फरार झाला असून, पोलिसांनी त्याचा शोध सुरू केला आहे.  
इतर बातम्या
Join Whatsapp Group