एकाच कुटुंबातील चौघांची रेल्वे मार्गावर आत्महत्या ! पहाटेच्या अंधारात घराबाहेर पडले अन ... नेमकं काय घडलं ?
एकाच कुटुंबातील चौघांची रेल्वे मार्गावर आत्महत्या ! पहाटेच्या अंधारात घराबाहेर पडले अन ... नेमकं काय घडलं ?
img
Nandini khandare More
एकाच कुटुंबातील चौघांनी  रेल्वे मार्गावर आत्महत्या केली असल्याची अत्यंत हृदयद्रावक घटना घडली आहे. सध्या राज्यात हत्या, आत्महत्येसारख्या अनेक गंभीर घटना घडत असून जळगाव जिल्ह्यातील अमळनेर तालुक्यात ही मन सुन्न करणारी घटना समोर आली आहे. टाकरखेडा येथील एकाच कुटुंबातील चार जणांनी धावत्या रेल्वेखाली स्वतःला झोकून देत सामूहिक आत्महत्या केली. २७ ऑगस्ट रोजी पहाटेच्या सुमारास घडलेल्या या भीषण घटनेत आई-वडिलांसह त्यांच्या दोन निष्पाप चिमुकल्यांचा दुर्दैवी अंत झाला आहे.र टाकरखेडा परिसरात शोककळा पसरली असून चौघांच्या मृत्यूने ग्रामस्थांना मोठा धक्का बसला आहे. 

मिळालेल्या माहितीनुसार, टाकरखेडा येथील सुनील अमृत भिल, त्याची पत्नी पार्वती भिल आणि दोन्ही मुली, हे पहाटेच्या सुमारास घरातून बाहेर पडले होते. त्यानंतर धरणगाव ते अमळनेर दरम्यानच्या रेल्वे मार्गावर चौघांचा मृत्यू झाल्याची माहिती समोर आली. मृतांमधील एका मुलीचे वय शालेय शिक्षणाच्या सुरुवातीच्या टप्प्यात तर दुसरी मुलगी अंगणवाडीमध्ये जात असल्याची माहिती मिळाली आहे. रेल्वे अधिकाऱ्यांकडून पोलिसांना माहिती गुरुवारी पहाटे सुमारे ४.४० वाजता पश्चिम रेल्वेच्या अधिकाऱ्यांनी अमळनेर पोलिसांना घटनेची माहिती दिली. 

माहिती मिळताच पोलिसांनी घटनास्थळी पोहोचून पंचनामा व आवश्यक कायदेशीर प्रक्रिया सुरू केली. घटनेची माहिती गावात पोहोचताच नागरिकांनी घटनास्थळी गर्दी केली. एकाच कुटुंबातील चौघांचा अशा प्रकारे मृत्यू झाल्याने ग्रामस्थांमध्ये हळहळ व्यक्त होत होती. कुटुंबातील दोन मुलांचाही मृत्यू झाल्याने या घटनेचे गांभीर्य अधिक वाढले आहे.

घरातून पहाटे बाहेर पडल्याची माहिती प्राथमिक माहितीनुसार, भिल कुटुंब पहाटेच्या सुमारास घरातून बाहेर पडले होते. त्यानंतर काही वेळातच रेल्वे प्रशासनाकडून पोलिसांना घटनेची माहिती मिळाली. मात्र कुटुंब नेमके कोणत्या परिस्थितीत घराबाहेर पडले आणि त्यानंतर काय घडले, याचा तपास पोलिसांकडून करण्यात येत आहे. या घटनेपूर्वी कुटुंबात काही कौटुंबिक किंवा अन्य प्रकारचा वाद होता का, याचीही चौकशी केली जात आहे. सध्या याबाबत कोणतीही अधिकृत माहिती समोर आलेली नाही. त्यामुळे केवळ चर्चेच्या आधारे कारण निश्चित करणे योग्य ठरणार नसून पोलिस तपासातूनच घटनेमागील पार्श्वभूमी स्पष्ट होणार आहे. 

आत्महत्येचे नेमके कारण अस्पष्ट पोलिसांनी घटनास्थळी पंचनामा करून पुढील तपास सुरू केला आहे. मृतांच्या कुटुंबीयांकडून तसेच परिचितांकडून माहिती घेतली जात आहे. घटनेपूर्वीची परिस्थिती जाणून घेण्याचा प्रयत्न केला जात आहे. कौटुंबिक परिस्थिती, आर्थिक अडचणी किंवा अन्य काही कारण होते का, यासह विविध शक्यता तपासल्या जात आहेत. घटनेचे नेमके कारण अद्याप अधिकृतपणे समोर आलेले नाही. प्राथमिक चर्चेत कौटुंबिक कारणाचा उल्लेख होत असला तरी त्याला अधिकृत दुजोरा मिळालेला नाही. एकाच कुटुंबातील चार जणांचा एकाच घटनेत मृत्यू झाल्याने टाकरखेडा गावावर शोककळा पसरली आहे. या घटनेने ग्रामस्थांना मोठा धक्का बसला असून, कुटुंबीय आणि नातेवाईकांवर दुःखाचा डोंगर कोसळला आहे. दरम्यान, पोलिसांकडून घटनेचा सखोल तपास सुरू असून, तपास पूर्ण झाल्यानंतरच या दुर्दैवी घटनेमागील नेमके कारण आणि घटनाक्रम स्पष्ट होणार आहे.
इतर बातम्या
Join Whatsapp Group