दुर्दैवी...! विद्युत तारेला स्पर्श होऊन विजेचा जोरदार झटका बसल्याने चौघांचा मृत्यू ; कुठे घडली घटना?
दुर्दैवी...! विद्युत तारेला स्पर्श होऊन विजेचा जोरदार झटका बसल्याने चौघांचा मृत्यू ; कुठे घडली घटना?
img
Dipali Ghadwaje
चंद्रपूर : शेतात काम करण्यासाठी गेलेल्या चार शेतकऱ्यांना विजेचा जोरदार झटका बसून मृत्यू झाल्याची दुर्दैवी घटना चंद्रपूरच्या ब्रह्मपुरी तालुक्यात घडली आहे. या घटनेमुळं परिसरात खळबळ उडाली आहे.

या घटनेबाबत मिळालेल्या माहितीनुसार , चंद्रपूरच्या ब्रह्मपुरी तालुक्यातील गणेशपुर गावाच्या शेतशिवारात सदरची दुर्दैवी घटना आज सकाळच्या सुमारास घडली आहे. जिल्ह्यात मागील दोन- तीन दिवसांपासून पाऊस सुरु होता. दरम्यान आज उघडीप असल्याने अनेक शेतकरी शेतात कामासाठी गेले होते. याच वेळी शेतात काम करीत असताना पुंडलिक मानकर, प्रकाश राऊत, युवराज डोंगरे व नानाजी राऊत या चार शेतकऱ्यांना तुटलेल्या विद्युत तारेला स्पर्श होऊन विजेचा जोरदार झटका बसला. यात त्यांचा जागीच मृत्यू झाल्याची माहिती मिळाली आहे.

पावसामुळे शेतात तार पडून दोन दिवसांपूर्वी झालेल्या मुसळधार पावसामुळे जिवंत विद्युत तारा शेतात पडून राहिल्यामुळे सदरची घटना घडली असल्याचे सांगण्यात येत आहे. दरम्यान घटनेची माहिती गावात समजताच गावकर्यांनी शेताकडे धाव घेतली. तसेच पोलिसांना या घटनेची माहिती देण्यात आली.
इतर बातम्या
Join Whatsapp Group