अमित शाह यांचा देवेंद्र फडणवीस यांना फोन ; नेमकी काय चर्चा झाली?
अमित शाह यांचा देवेंद्र फडणवीस यांना फोन ; नेमकी काय चर्चा झाली?
img
Dipali Ghadwaje
राज्याच्या राजकारणातून एक महत्वाची बातमी समोर येत आहे. लोकसभा निवडणुकीमध्ये राज्यात सत्ताधारी महायुतीची धुळदाण उडाल्यानंतर महायुतीच्या नेत्यांसह सरकारमध्येही सुद्धा एकच खळबळ उडाली आहे. फडणवीस आज दिल्ली मुक्कामी असणार या सर्व पार्श्वभूमीवर देवेंद्र फडणवीस यांची मागणी केंद्रीय नेत्यांकडून मान्य केली जाते का? याकडे लक्ष लागून
राहिलं आहे. 

दरम्यान, मिळालेल्या माहितीनुसार अमित शाह आणि उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्यामध्ये फोनवरून चर्चा झाली आहे. या चर्चेमध्ये उपमुख्यमंत्रीपद सोडण्यावर चर्चा झाल्याची माहिती समोर येत आहे. दुसरीकडे, देवेंद्र फडणवीस आज दिल्ली दौऱ्यावर मुक्कामी जात आहेत. या मुक्कामी दिल्लीतील कोणत्या नेत्यांच्या भेटीगाठी करतात आणि काय निर्णय होते याकडे सुद्धा लक्ष असेल.

देवेंद्र फडणवीस काय म्हणाले?
 दरम्यान, काल (5 जून) फडणवीस यांनी पराभवाची जबाबदारी घेत बाजूला होण्याची विनंती केल्याने प्रदेश भाजपसह राज्य सरकारमध्येही खळबळ उडाली आहे. फडणवीस यांनी उपमुख्यमंत्रीपदाच्या जबाबदारीतून मुक्त करण्याची विनंती पक्षश्रेष्ठींना ष्ठीं केली. दुसरीकडे, त्यांच्या भूमिकेला भाजप नेत्यांनी विरोध केला आहे.

मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनीही पराभवाची जबाबदारी सर्व घटक पक्षांची असल्याचे म्हटले आहे. निकालानंतर दुसऱ्या दिवशी फडणवीस यांच्यासह प्रदेशाध्यक्ष बावनकुळे, मुंबई भाजप अध्यक्ष आशीष शेलार आदी नेत्यांची बैठक झाली. यामध्ये मतदारसंघनिहाय आढावा घेण्यात आला. यानंतर घेतलेल्या पत्रकार परिषदेनंतर उपमुख्यमंत्रीपदाच्या जबाबदारीतून मुक्त होण्याचा विनंती त्यांनी केली. तसेच पक्षश्रेष्ठींची ष्ठीं भेट घेऊन चर्चा करणार असून त्यांच्या सल्ल्यानुसार पुढील निर्णय घेईन, असे फडणवीस यांनी नमूद केले.

दरम्यान, महायुतीची पिछेहाट कोणत्या मुद्यांवर झाली याबाबतही या बैठकीत चर्चा करण्यात आली. यामध्ये मराठा आरक्षण, धनगर आरक्षण, शेती प्रश्नांशी निगडीत फटका बसल्याचा सूर होता. त्यामुळे विधानसभेला सामोरे जाण्यासाठी अवघ्या काही दिवसांचा कालावधी असल्याने तयारी करण्यासाठी फडणवीस यांनी पदातून बाजूला होण्याची भूमिका घेतली आहे. 
 
इतर बातम्या
Join Whatsapp Group