NEET च्या विद्यार्थ्यांना दिलासा ; सुप्रीम कोर्टाची महत्वपूर्ण टिप्पणी
NEET च्या विद्यार्थ्यांना दिलासा ; सुप्रीम कोर्टाची महत्वपूर्ण टिप्पणी
img
दैनिक भ्रमर
 नवी दिल्ली : NEET परीक्षेतील हेराफेरीच्या आरोपांसंदर्भात सर्वोच्च न्यायालयात दाखल करण्यात आलेल्या तीन याचिकांवर आज सुनावणी पार पडली. NEET परीक्षा आयोजित करणारी संस्था NTA कडून विद्यार्थ्यांना परीक्षेत दिलेल्या वाढीव गुणांबाबत आज सर्वोच्च न्यायालयात युक्तिवाद झाला. परीक्षा रद्द करून फेरपरीक्षा घेण्याबाबत याचिका सर्वोच्च न्यायालयात याचिका दाखल करण्यात आली असून याचप्रकरणी सुनावणी पार पडली. विद्यार्थ्यांनी घाबरण्याची गरज नाही, असं सर्वोच्च न्यायालयानं सुनावणी दरम्यान स्पष्ट केलं. 

सुप्रीम कोर्टात आज NEET-UG 2024 च्या निकालाला आव्हान देणाऱ्या तीन याचिकांवर सुनावणी झाली आहे.
 ४ जून रोजी निकाल जाहीर झाल्यानंतर सुप्रीम कोर्टात या याचिका दाखल करण्यात आल्या होत्या. परीक्षेतील अनियमिततेच्या आरोपांची SIT समितीमार्फत चौकशी करण्यात यावी, अशी याचिकेत मागणी करण्यात आली होती. यासोबतच ४ जूनच्या निकालाच्या आधारे केले जाणारे कॉउंसलिंग बंद करण्यात यावे, अशीही मागणी करण्यात आली होती. कॉउंसलिंगवर बंदी घालण्यास सर्वोच्च न्यायालयाने नकार दिला आहे. १५६३ विद्यार्थ्यांसाठी २३ जून रोजी पुनर्परीक्षा होणार असल्याची माहिती एनटीएने न्यायालयात दिली आहे. पूर्णपणे परीक्षा रद्द करणे योग्य नसल्याची टिप्पणी न्यायालयाने केली आहे. एनटीएला दोन आठवड्यांत याचिकांवर उत्तर दाखल करण्याचे निर्देश न्यायालयाने आजच्या सुनावणीमध्ये दिलेले आहेत.

५ मे रोजी घेण्यात आलेली नीट परीक्षा रद्द करून पुन्हा परीक्षा घेण्यात यावी, असा उल्लेख याचिकेत करण्यात आला होता. यापूर्वी ११ जून रोजी सुप्रीम कोर्टात विद्यार्थिनी शिवांगी मिश्रा आणि इतर ९ विद्यार्थ्यांच्या याचिकेवर सुनावणी झाली होती. ती याचिका निकाल जाहीर होण्यापूर्वी म्हणजे १ जून रोजी कोर्टात दाखल करण्यात आली होती.

यावेळी फेरपरीक्षेची तारीख आजच ठरवली जाईल, असं न्यायालयाने म्हटलं आहे. तर कोर्टाच्या निर्देशानुसार २३ जून रोजी १५६३ विद्यार्थ्यांची पुनर्परीक्षा होणार आहे. या परिक्षेचा निकाल ३० जूनपूर्वी निकाल लावला जावा, अशा सूचना न्यायालयाने दिल्या आहेत. १५६३ विद्यार्थ्यांना त्यांचे मार्क हे ग्रेस मार्कांशिवाय दिले जाणार आहेत. एनटीएने दिलेली माहिती कोर्टाने नाकारली आहे. बाकी २ याचिकांवर न्यायालयाने पुढील दोन आठवड्यांनंतर सुनावणी होणार आहे.

सर्वोच्च न्यायालयानं सुनावणीदरम्यान म्हटलं की, तुमची मागणी एनटीएनं मान्य केली आहे. ते ग्रेस मार्क काढून टाकत आहेत. ग्रेस मार्क मिळालेल्या विद्यार्थ्यांचे निकाल रद्द करण्यात येणार आहेत. तसेच, निकाल रद्द झालेल्यांना पुन्हा परीक्षा देण्याची मुभाही सरकारच्या वतीनं देण्यात आली आहे. या परीक्षेसाठी ज्या विद्यार्थ्यांना ग्रेस मार्किंग मिळाले आहेत, तेच पात्र असतील. तसेच, NTA नं सांगितलं की, 23 जून रोजी पुन्हा परीक्षा (1563) होईल, त्यानंतर समुपदेशन होईल. तिसऱ्या याचिकेतील पेपर लीकचा मुद्दा सर्वोच्च न्यायालयासमोर नाही. तसेच, निकाल 30 जूनपूर्वी येऊ शकतो.

NEET परीक्षेच्या निकालाबाबत सर्वोच्च न्यायालयात अनेक याचिका दाखल करण्यात आल्या आहेत. त्यापैकी ग्रेस मार्क्स, पुनर्परीक्षा आणि परीक्षा रद्द करण्याबाबतच्या याचिकांवर आज (13 जून) सर्वोच्च न्यायालयात सुनावणी पार पडली. न्यायमूर्ती विक्रम नाथ यांच्या अध्यक्षतेखालील खंडपीठ या प्रकरणाची सुनावणी करणार आहे. दिल्ली हायकोर्टात काल (12 जून) NEET परीक्षेबाबतही सुनावणी झाली. 
इतर बातम्या
Join Whatsapp Group