"मोदींनी युक्रेन, गाझामधील युद्ध थांबवल्याचे म्हटलं जातं, पण देशात पेपर लीक...." नेमकं काय म्हणाले राहुल गांधी
img
Dipali Ghadwaje
नवी दिल्ली :  इस्रायल आणि गाझा यांच्यातील युद्धही नरेंद्र मोदींनी थांबवले होते. पण कुठल्या ना कुठल्या कारणाने नरेंद्र मोदी भारतात पेपरफुटीचे प्रकार थांबवू शकत नाहीत किंवा थांबवू इच्छित नाहीत, अशा शब्दात राहुल यांनी मोदींवर तोफ डागली. पेपर लीक प्रकरणावरून काँग्रेस नेते राहुल गांधी यांनी केंद्रातील एनडीए सरकारवर हल्लाबोल केला.

NEET आणि UGC-NET पेपर लीक प्रकरणावर, काँग्रेस खासदार राहुल गांधी यांनी हा मुद्दा संसदेत उपस्थित करू, असे सांगितले. मोदींनी युक्रेनमधील युद्ध थांबवल्याचे बोलले जात होते. पण पीएम मोदी पेपर लीक थांबवू शकत नाहीत. दरम्यान प्रामाणिक विद्यार्थ्यांची फसवणूक झाली असून NEET चा पेपर लीक झाल्याचे ते म्हणाले. त्यामुळे दोषींवर कठोर कारवाई करावी असही ते म्हणाले . 

शैक्षणिक संस्था आरएसएस-भाजपच्या ताब्यात 

यावेळी ते म्हणाले की, बिहारबाबत आमचा मुद्दा असा आहे की, पेपर लीक करणाऱ्यांवर चौकशी झाली पाहिजे आणि कारवाई झाली पाहिजे. शैक्षणिक संस्था आरएसएस-भाजपच्या ताब्यात आहेत आणि हे बदलल्याशिवाय पेपरफुटी थांबणार नाही, असे राहुल गांधी म्हणाले. भारत जोडो न्याय यात्रेदरम्यान हजारो लोकांनी पेपर फुटल्याची तक्रार केली होती. NEET, UGC NET चे पेपर लीक झाले, UGC-NET परीक्षा रद्द. हा व्यापमचा देशाच्या इतर भागात विस्तार आहे. पेपरफुटीचा मुद्दा आम्ही संसदेत उपस्थित करू.

ते पुढे म्हणाले की, 'भारत जोडो यात्रेदरम्यान हजारो तरुणांनी पेपरफुटीच्या तक्रारी केल्या होत्या. आता NEET पेपरमधील घोटाळा समोर आला आहे. NET-UGC रद्द करण्यात आले आहेत. पेपरफुटीमागे शिक्षण व्यवस्थेला भाजपच्या पालक संघटनेने काबीज केले आहे. जोपर्यंत तो पूर्ववत होत नाही तोपर्यंत पेपरफुटी सुरूच राहणार आहे.मोदीजींनी हे होऊ दिले आहे, जे देशविरोधी कृत्य आहे. NEET UG परीक्षा रद्द करण्याच्या मागणीसाठी देशभरात निदर्शने होत आहेत. लखनौ विद्यापीठातील विद्यार्थ्यांनी शिक्षणमंत्र्यांच्या राजीनाम्याची मागणी केली आहे.
 
इतर बातम्या
Join Whatsapp Group