कॅप्टन होताच निक्कीचा तोरा वाढला ; बिग बॉसच्या घरात नेमकं काय चाललंय? वाचा....
कॅप्टन होताच निक्कीचा तोरा वाढला ; बिग बॉसच्या घरात नेमकं काय चाललंय? वाचा....
img
Dipali Ghadwaje
बिग बॉस मराठीमध्ये एका मागोमाग एक नवीन ट्वीस्ट पाहायला मिळत आहेत. नुकताच बिग बॉसच्या घरातील कॅप्टन बदलला आहे. या आठवड्यात टास्क जिंकून अरबाज कॅप्टन बनला होता, मात्र डिलेमा टास्कमध्ये अरबाजने कॅप्टन्सी सोडत घरातील सदस्यांसाठी रेशचा पर्याय निवडला.

यानंतर त्याने निक्कीला कॅप्टन बनवलं. त्यामुळे बिग बॉस मराठीच्या घरातील कॅप्टन बनली आहे. मात्र, निक्की कॅप्टन बनल्यानंतर तिचा तोरा वाढला असल्याचं तिच्या मित्रांनाच जाणवत आहे.

बिग बॉस मराठीच्या घरात आल्यापासूनच निक्की तांबोळीची सुरुवातीपासूनच कॅप्टन होण्याची इच्छा होती. या आठवड्यात निक्कीची ही इच्छा अरबाजमुळे पूर्ण झाली, पण निक्की कॅप्टन झाल्यानंतर तिच्या स्वभावात बदल झालं असल्याचं अरबाजला वाटत आहे.पण, फक्त अरबाजच नाही, तर घनश्या:म आणि जान्हवीलाही कॅप्टन झाल्यानंतर निक्कीच्या स्वभात बदल झाल्याचं जाणवत आहे.

बिग बॉसच्या घरातील नवीन प्रोमोमध्ये अरबाज म्हणतो, थोडं वेगळं-वेगळं वागतेय. यावर जान्हवी बोलते, तुला पण वाटलं? यावर अरबाज होकार देतो. मग जान्हवी म्हणजे पावर आल्यासारखं, अरबाज म्हणतो, तिचं वागणं बदललंय. यानंतर जान्हवी पुढे म्हणते, अरबाज आपलं निरीक्षण जे काही असतंना. यानंतर अरबाज घनश्या:मला विचारतो. यावर घनश्या:म म्हणतो, मला  त्यादिवशीचं दिसलं. पुढे जान्हवी म्हणते, सेम... सेम... सेम... मी पण मगासपासून बघतेय. 

अरबाज पुढे म्हणतो की, अशीच लाईफ आहे बाहेरपण. कधी तुम्ही बंगल्यामध्ये असणार, कधी तुम्ही महालात आणि कधी तुम्ही रस्त्यावर असणार. यावर घनश्या:म म्हणतो, बिग बॉसच्या घरात तेच शिकायचंय. अरबाज म्हणतो, "तुमच्या हातात काहीच नाहीय, इथे जे सगळे आले आहेत. त्यांच्या हातात आहे आणि ज्यांना तुम्ही दिलंय तेच खाऊन-पिऊन हात पुसून जातात, हे असे लोक आहेत बिग बॉसच्या घरात, हे दाखवतं बिग बॉस".
 
इतर बातम्या
Join Whatsapp Group