१३ मे २०२६
अमेरिका-इराण संघर्षामुळे निर्माण झालेल्या तणावाचा परिणाम आता भारतातही दिसू लागला आहे. स्ट्रेट ऑफ होर्मूज बंद झाल्याने जागतिक ऊर्जा संकटाची भीती वाढली असून, याच पार्श्वभूमीवर पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी देशवासियांना इंधन बचतीचे आवाहन केले होते. पेट्रोल-डिझेलचा वापर कमी करा, इलेक्ट्रिक वाहनांचा अधिक वापर करा तसेच अनावश्यक खर्च टाळा, असे आवाहन त्यांनी केले होते.
या घडामोडींमुळे आता सरकार आणखी कोणते मोठे निर्णय घेणार, याकडे सर्वांचे लक्ष लागले आहे.पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या आवाहानानंतर आता शिवसेना नेते आणि मंत्र्यांनी मोठा निर्णय घेतला आहे. याबाबत मंत्री उदय सामंत यांनी माहिती दिली आहे.
मंत्र्यांचे सर्व परदेश दौरे रद्द करण्यात आले आहेत. तसेच मर्यादित ताफा वापरण्याचा निर्णय शिवसेना मंत्र्यांनी घेतला आहे. अनेक मंत्र्यांनी आता इलेक्ट्रिक कार वापरण्यास सुरुवात देखील केली आहे, उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे हे देखील इलेक्ट्रिक कार वापरत असल्याची माहिती यावेळी उदय सामंत यांनी दिली आहे.
ही गोष्ट समजून घेण्यासारखी आहे. कारण पंतप्रधान नरेद्र मोदी यांनी देशाला केलेले जे आवाहान आहे, त्यामध्ये इलेक्ट्रिकल व्हेकल असू दे किंवा ताफा कमी करण्याचं आवाहन असू दे, आम्ही त्याची अमंलबजावणी करत आहोत. स्वत: शिवसेनेचे मुख्य नेते एकनाथ शिंदे साहेबांनी याची सुरुवात केली आहे. मी देखील आता मुंबई परिसरात इव्ही गाडी वापरत आहे. ताफा देखील कमी करण्यात आला आहे, सुरक्षिततेच्या दृष्टीकोणातून आवश्यक आहे, तेवढाच ताफा ठेवण्यात आला आहे.
सगळे परदेश दौरे देखील रद्द झाले आहेत. शेवटी सांगून एखादा निर्णय घेण्यापेक्षा जे आवाहान पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी केलं होतं, त्या आवाहानाला प्रतिसाद म्हणून अनेक मंत्र्यांनी आपले परदेश दौरे रद्द केले आहेत. शंभूराज देसाई असतील, आशिष शेलार असतील यांनी आपले परदेश दौरे रद्द केले आहेत. सरकार म्हणून आमची जी जबादारी आहे, ती आम्ही पार पाडू असं यावेळी उदय सामंत यांनी म्हटलं आहे.
Copyright ©2026 Bhramar