आज पहिलाच श्रावण सोमवार असल्याने देशभरात सर्वच भाविक मंदिरात जाऊन महादेवाची पूजा अर्चना करण्यात तल्लीन आहेत. श्रावण महिन्याचे विशेष महत्व असून या संपूर्ण महिनाभर भाविक अतिशय श्रद्धेने देवाची आराधना करतात. दरम्यान आता आज पहिल्याच श्रवण सोमवारी एक अतिशय दुर्दैवी घटना घडली आहे.
बिहारमधील लखीसराय येथील प्रसिद्ध अशोकधाम मंदिरात श्रावण सोमवारी दर्शनासाठी आलेल्या भाविकांसोबत दुर्दैवी घटन घडली आहे. मंदिरात जलाभिषेकासाठी जमलेल्या सुमारे ५० हजार भाविकांच्या गर्दीत अचानक विजेची तार तुटून पडल्याने चेंगराचेंगरी झाली. या दुर्घटनेत ७ भाविकांचा दुर्दैवी मृत्यू झाला आहे. तर १२ पेक्षा जास्त भाविक गंभीर जखमी झाले आहेत. जखमींवर लखीसराय सदर रुग्णालयात उपचार सुरू आहेत. आज सकाळी साडेसहा वाजता ही दुर्घटना घडली
जलाभिषेकासाठी रांगेत उभे असलेल्या गर्दीवर विजेची तार पडल्याने घबराट पसरली आणि चेंगराचेंगरी झाली. मंदिरात भाविकांची प्रचंड आणि अनपेक्षित गर्दी जमली होती. सकाळी साडेसहा ते पावणेसातच्या सुमारास एकाच वेळी दोन गाड्या (ट्रेन) आल्याने गर्दीत आणखी भर पडली. आम्ही गर्दीचा अंदाज घेऊन आधीच योग्य ती व्यवस्था केली होती. मात्र, गर्दीच्या अति प्रचंड दाबामुळे एका बाजूचे बॅरिकेडिंग (संरक्षक कठडे) तुटले आणि लोक एकमेकांवर पडू लागले. ही माहिती मिळताच आम्ही तातडीने १० ते १५ जणांना रुग्णालयात हलवले, अशी माहिती जिल्हाधिकारी शैलेंद्र कुमार यांनी दिली.
मिळालेल्या माहितीनुसार, ही दुर्घटना झाली त्यावेळी मंदिर परिसरात मोठ्या प्रमाणात गर्दी जमली होती. श्रावण सोमवार असल्याने हजारो भाविक जलाभिषेकासाठी रांगेत उभे होते. त्याच वेळी अचानक विजेची तार पडल्यामुळे लोकांमध्ये भीती पसरली. काही जण घाबरून धावू लागले, त्यामुळे चेंगराचेंगरी झाली. या गर्दीत अनेक महिला दबल्या गेल्यामुळे त्यांचा जागीच मृत्यू झाला. एलपीजीवर केंद्र सरकारचा मोठा निर्णय! इतिहासात पहिल्यांदाच कंपन्यांना दिले 'हे' आदेश; सर्वसामान्यांवर काय परिणाम? घटनेची माहिती मिळताच पोलीस, प्रशासकीय अधिकारी आणि वैद्यकीय पथके तातडीने घटनास्थळी पोहोचली. जखमींना तात्काळ लखीसराय येथील सदर रुग्णालयात दाखल करण्यात आले आहे. जखमींपैकी काहींची प्रकृती चिंताजनक असल्याचे सांगितले जात आहे. सध्या मदत आणि बचाव कार्य वेगाने सुरू असून प्रशासन परिस्थिती नियंत्रणात आणण्याचा प्रयत्न करत आहे.