मोठी बातमी ! भाजपचा मोठा डाव ; एकाच वेळी ३६ जिल्ह्यांचे अध्यक्ष बदलले, पाहा यादी
मोठी बातमी ! भाजपचा मोठा डाव ; एकाच वेळी ३६ जिल्ह्यांचे अध्यक्ष बदलले, पाहा यादी
img
Nandini khandare More

सध्या देशाच्या राजकारणासह भाजपच्या गोटात मोठ्या हालचाली सुरु असून आता भाजपमधून एक मोठी बातमी समोर आली आहे.   भाजप पंजाबमधील सर्व ११७ जागांवर स्वबळावर निवडणूक लढण्याच्या तयारीत आहे. दरम्यान, पंजाबमधील आगामी विधानसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर भाजपमध्ये अंतर्गत नाराजी आणि वाद मिटवण्यासाठी पक्षश्रेष्ठींनी मोठा निर्णय घेतला आहे. पंजाब भाजपचे अध्यक्ष केवळ सिंग ढिल्लो यांनी राज्यातील सर्व ३६ संघटनात्मक जिल्ह्यांसाठी नव्या प्रभाग आणि सह-प्रभाऱ्यांची घोषणा केली आहे. विधानसभा निवडणुकीआधी पक्षातील अंतर्गत वाद आणि नाराजी समोर आली होती. त्यामुळे भाजपकडून राज्यातील संघटनेत बदल करण्यात आले आहेत. पक्ष बळकट करण्यासाठी आणि गावागावांपर्यंत नेटवर्क तयार करण्यासाठी भाजपने हा निर्णय घेतला आहे. यामध्ये पक्षातील जुन्या निष्ठावंतांसह इतर पक्षांतून आलेल्या नव्या नेत्यांनाही महत्त्वाची जबाबदारी सोपवण्यात आली आहे. 

दरम्यान, निवडणुकीच्या आधी पक्षात झालेला हा बदल अत्यंत महत्त्वाचा मानला जात आहे. काही भागांतील जिल्हा नेतृत्वातील बदलांवरून पंजाब भाजपमध्ये अलीकडेच झालेल्या मतभेदांनंतर, राज्य युनिटमध्ये संघटनात्मक बदल होत असताना या नवीन नियुक्त्या करण्यात आल्या आहेत. ढिल्लन यांनी सांगितले होते की, पक्षाची गावपातळीपर्यंत पथके तयार करण्याची योजना आहे. पंजाब भाजपने सर्व ११७ विधानसभा जागा एकट्याने लढवण्याचा आपला इरादाही व्यक्त केला आहे.

नव्या यादीत इतर पक्षांतून भाजपमध्ये आलेल्या नेत्यांसह पक्षाच्या जुन्या पदाधिकाऱ्यांचा समावेश आहे. यातून पक्षाचे पारंपरिक संघटनात्मक जाळे नव्या राजकीय आधाराशी जोडण्याचा प्रयत्न दिसून येतो. यामध्ये अश्वनी सेखरी यांच्याकडे अमृतसर ग्रामीण, रणजित सिंग खोजेवाल यांच्याकडे अमृतसर ग्रामीण-२, तर राकेश राठोड यांच्याकडे अमृतसर शहराची जबाबदारी देण्यात आली आहे. याशिवाय निपुण शर्मा यांच्याकडे बरनाला, रविकरन सिंग काहलॉन यांच्याकडे बटाला, सुरजित ज्यानी यांच्याकडे बठिंडा ग्रामीण आणि मनजित सिंग राय यांच्याकडे बठिंडा शहराचा प्रभार सोपवण्यात आला आहे. तसेच मोना जयस्वाल फरिदकोटच्या, तर के. डी. भंडारी फतेहगड साहिबचे प्रभारी असतील. 

याशिवाय सतीश असिजा यांच्याकडे फाजिल्का, जीवन गुप्ता यांच्याकडे फिरोजपूर, तर हरविंदर सिंग संधू यांच्याकडे गुरदासपूरची जबाबदारी सोपवण्यात आली आहे. होशियारपूर शहराचा कारभार सुशील शर्मा आणि होशियारपूर ग्रामीणचा कारभार राकेश शर्मा पाहतील. अनिल सच्चर यांच्याकडे जगराओनची जबाबदारी देण्यात आली आहे. जालंधर ग्रामीण उत्तरचे कामकाज पुष्पेंद्र सिंघल, जालंधर ग्रामीण दक्षिणचे करमजीत कौर चौधरी आणि जालंधर शहराचे कामकाज सूरज भारद्वाज यांच्याकडे सोपवण्यात आले आहे. 

मनजीत सिंग मन्ना यांच्याकडे कपूरथला, अमरजीत सिंग अमरी यांच्याकडे खन्ना, गेज्जा राम वाल्मिकी यांच्याकडे लुधियाना ग्रामीण आणि दयाल सिंग सोधी यांच्याकडे लुधियाना शहराची जबाबदारी सोपवण्यात आली आहे. सुशील रिंकू यांची मालेरकोटलाचे प्रभारी म्हणून नियुक्ती करण्यात आली आहे. उर्वरित जिल्ह्यांमध्ये के. के. मल्होत्रा मानसाचे, चरणजीत सिंग ब्रार मोगाचे, जतिंदर मित्तल मोहालीचे, रंजम कामरा मुक्तसरचे, सुभाष शर्मा नवांशहरचे आणि राजेश हनी पठाणकोटचे काम पाहतील. याशिवाय पटियाला ग्रामीण उत्तरचे प्रभारी म्हणून एस. के. देव, पटियाला ग्रामीण दक्षिणसाठी जस्मिन संधवालिया आणि पटियाला शहरासाठी विनय शर्मा यांची नियुक्ती करण्यात आली आहे.

रोपरची जबाबदारी रणजित सिंग गिल, संगरूर-१ ची मंगत राय बन्सल, संगरूर-२ ची हरमिंदर सिंग जस्सी आणि तरनतारनची जबाबदारी नरेश शर्मा यांच्याकडे सोपवण्यात आली आहे.  पक्षाच्या निवेदनानुसार, अमृतसर ग्रामीणसाठी अश्वनी सेखरी (प्रभारी) व अजयबीरपाल सिंग रंधावा (सह-प्रभारी), अमृतसर ग्रामीण-२ साठी रणजित सिंग खोजेवाल (प्रभारी) व मानव तनेजा (सह-प्रभारी), तर अमृतसर शहरासाठी राकेश राठोर (प्रभारी) व अनिल वासुदेव (सह-प्रभारी) काम पाहतील. तसेच बरनालाची जबाबदारी निपुण शर्मा व ओंकार सिंग सिद्धू, बटालाची जबाबदारी रविकरण सिंग काहलॉन व विजय शर्मा आणि बठिंडा ग्रामीणची जबाबदारी सुरजीत जियानी व राजेश पटेला यांच्याकडे अनुक्रमे प्रभारी आणि सह-प्रभारी म्हणून सोपवण्यात आली आहे."
इतर बातम्या
Join Whatsapp Group