नागरिकांनो सावधान ! थंडीचा कहर; गेल्या २४ तासांत पाच जणांचा गारठून मृत्यू
नागरिकांनो सावधान ! थंडीचा कहर; गेल्या २४ तासांत पाच जणांचा गारठून मृत्यू
img
Dipali Ghadwaje
देशभरात कडाक्याची थंडी पडली आहे. वाढत्या थंडीमुळे नागरिकांचे जनजीवन विस्कळीत झाल्याचे पाहायला मिळत आहे. यातच बिहारमध्ये थंडीमुळे एक हवालदार आणि दोन विद्यार्थ्यांसह पाच जणांचा मृत्यू झाल्याची माहिती समोर आली.

याबाबत मिळालेल्या माहितीनुसार, हे सर्व मृत्यू वेगवेगळ्या जिल्ह्यांमध्ये झाले आहेत. मृतक मुझफ्फरपूर, गोपालगंज, बक्सर, लखीसराय आणि छप्रा येथील रहिवासी आहेत.
मुझफ्फरपूरच्या बोचाहान येथे इयत्ता सहावीत शिकणारा एक मुलगा सकाळी शाळेत गेला होता. सकाळी १० वाजल्यानंतर तो थरथरत घरी पोहोचला. घरी पोहोचल्यावर त्याने सांगितले की त्याने पॅन्टमध्ये शौच केले. त्याला डॉक्टरांकडे नेण्यात आले, मात्र तोपर्यंत त्याचा मृत्यू झाला. मुजफ्फरपूरचे डीएम प्रणव कुमार यांनी सांगितले की, बोचहानमध्ये थंडीमुळे एका मुलाचा मृत्यू झाल्याची बातमी आहे, तर दुसऱ्या ठिकाणी मुलगी बेशुद्ध झाल्याची माहिती आहे.

त्याचवेळी गोपालगंजचे ४५ वर्षीय शंभू राय हे पोलीस लाईन देहरीमध्ये तैनात होते. बुधवारी त्यांची प्रकृती खालावली आणि उपचारपूर्वीच त्यांचा मृत्यू झाला. 
बक्सरच्या सिमरी रामोपट्टीमध्ये पटवन करून घरी परतलेले शेतकरी चंद्रदीप राम आजारी पडल्याने त्यांची प्रकृती खालावल्याने त्यांना आरोग्य केंद्रात नेण्यात आले. तेथून पीएमसीएचमध्ये जात असताना चंद्रदीपचा मृत्यू झाला. तर, लखीसराय येथील कजरा प्राथमिक शाळेतील श्रीधना येथील इयत्ता पहिलीचा विद्यार्थी प्रार्थनेदरम्यान बेशुद्ध झाला. डॉक्टरांकडे नेत असताना त्यांचा मृत्यू झाला. याशिवाय, सारण येथील खराटी गावात ५२ वर्षीय नागेश्वर ठाकूर यांचा मृत्यू झाला. या सगळ्यांचे मृत्यू थंडीमुळे झाल्याचा अंदाज व्यक्त केला जात आहे.

दरम्यान हवामान खात्याच्या अंदाजानुसार, बिहारमध्ये संपूर्ण जानेवारी महिन्यात कडाक्याच्या थंडीचा सामना करावा लागणार आहे. त्यानंतर फेब्रुवारीच्या पहिल्या आठवड्यापासून थंडीची तीव्रता कमी होण्याची शक्यता आहे.
इतर बातम्या
Join Whatsapp Group