भाजपचा अजित पवारांना २५ जागांवर मैत्रीपूर्ण लढतींचा प्रस्ताव? या नेत्याचा खळबळजनक दावा
भाजपचा अजित पवारांना २५ जागांवर मैत्रीपूर्ण लढतींचा प्रस्ताव? या नेत्याचा खळबळजनक दावा
img
Dipali Ghadwaje
राज्याच्या राजकारणातून एक मोठी बातमी समोर आली आहे. विधानसभेला अजित पवार महायुतीतून बाहेर पडतील अशी चर्चा राजकीय वर्तुळात सुरु झाली आहे. रोहित पवार याचे दावे करत असतानाच महायुतीचा भाग असलेल्या रवी राणा यांनी देखील तसेच संकेत देणारे वक्तव्य केले आहे. 

अजित पवार गट तिसऱ्या आघाडीतून किंवा वेगळे लढण्याची शक्यता वर्तविली जात आहे. हा दिल्लीतूनच आदेश आला आहे, असाही दावा विरोधकांकडून केला जात आहे. भाजपला अजित पवारांना सोबतघेऊन लढल्याचा फटका बसायला नको म्हणून ही खेळी केली जात असल्याचा दावा रोहित पवार यांनी केला होता. आता राणांनी बडनेरा मतदारसंघामध्ये आपली महायुतीमधून उमेदवारी जाहीर करताना मोठे वक्तव्य केले आहे.

नेमकं काय म्हणाले रवी राणा? 

ज्या ठिकाणी तिन्ही पक्षाचे उमेदवार मजबूत आहेत त्या ठिकाणी उमेदवाराला थांबवल्याने पक्षाचे मोठे नुकसान होते. भाजपने ज्या पण 25 ठिकाणी मैत्रीपूर्ण लढतीचा जो प्रस्ताव दिला आहे तो अजित पवारांनी सुद्धा स्वीकारायला हवा. अजित पवार यांच्या उमेदवारांमध्ये जेवढा दम आहे तेवढे उमेदवार त्यांनी निवडणुकीमध्ये उतरवावेत. भाजपचे जे मजबूत उमेदवार आहेत ते उतरतील. दमदार उमेदवाराला थांबवणे म्हणजे महायुतीचे नुकसान आहे, असे राणा म्हणाले. 

भाजपने ज्या पंचवीस जागा मागितल्या आहेत त्यामध्ये अमरावती शहर मतदारसंघही आहे. बडनेरा मतदारसंघामध्ये महायुतीचा मी उमेदवार आहे. मला देवेंद्र फडणवीस यांनी हिरवा झेंडा दिला आहे. मी युवा स्वाभिमान पक्षाकडून लढणार असून माझे चिन्ह पाना आहे. माझ्या पक्षासाठी मी महायुतीत पाच ते सहा जागा मागितल्या आहेत, असेही राणा म्हणाले.
इतर बातम्या
Join Whatsapp Group