पालकांनो सावधान..!
पालकांनो सावधान..! "..... म्हणून मुलीनं उचललं टोकाचं पाऊल" ; नेमकं काय प्रकरण?
img
Dipali Ghadwaje
ठाणे :  कल्याण डोंबिवलीत दोन वेगवेगळ्या घटना घडल्याने जिल्ह्यात एकच खळबळ उडाली आहे. कल्याणमध्ये एका 19 वर्षीय तरुणीला आईने मोबाईल वापरण्यास नकार दिल्यामुळे त्या तरुणीने आत्महत्या केली, तर कल्याणमध्ये एका 11 वर्षीय मुलाला भेटण्याकरीता त्याची अल्पवयीन मैत्रीण घरात आली असता तिच्या आई-वडिलांनी मुलीची चौकशी करुन तिला तिच्या घरी सोडले. मात्र, आई-वडिल मुलीला तिच्या घरी सोडायला जाताच, इकडे मुलाने घरातच आत्महत्या केल्याची धक्कादायक घटना उघडकीस आली आहे. 

याप्रकरणी पोलीस तपास सुरू आहे. कल्याणमध्ये एका 11 वर्षीय मुलाच्या घरी भेटण्यासाठी 13 वर्षाची मैत्रीण आली होती. मात्र, त्या मैत्रीणीला तिच्या घरी सोडण्यासाठी मुलाचे आई वडिल गेले असता, घरात गळफास घेऊन मुलाने आपले जीवन संपवल्याचा धक्कादायक प्रकार घडला आहे. कोळसेवाडी पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, या मुलाला भेटण्यासाठी त्याची 13 वर्षांची मैत्रिण घरी आली होती. त्या मुलीला घरात पाहून मुलाच्या आईवडिलांनी तिची चौकशी केली.

त्यानंतर मुलीला सोबत घेऊन ते तिच्या टिटवाळ्यातील घरी गेले. टिटवाळ्यातून आई-वडील घरी आल्यावर मुलानं आत्महत्या केल्याचं त्यांना दिसलं. मुलाने नक्की कोणत्या कारणामुळे जीव दिला त्याचा पोलीस तपास करत आहेत.
 
इतर बातम्या
Join Whatsapp Group