भीषण अपघात !  भरधाव ट्रकने आठ ते दहा गाईंना चिरडलं
भीषण अपघात ! भरधाव ट्रकने आठ ते दहा गाईंना चिरडलं
img
दैनिक भ्रमर
नियंत्रण सुटलेल्या ट्रकने आठ ते दहा गाईंना चिरडल्याचा भीषण अपघात नागपूर येथे घडला आहे. ही घटना उमरेड तालुक्यातील बेसूर शिवारात घडली आहे.कोळसा वाहतूक करणाऱ्या ट्रकनं गाईंना चिरडलं या दुर्दैवी घटनेत आठ ते दहा गाईंचा जागीच मृत्यू झाला आहे. ट्रकवरील नियंत्रण सुटल्यानं हा भीषण अपघात झाल्याची माहिती समोर येत आहे. या घटनेत मोठं नुकसान झालं असून, ग्रामस्थांनी संताप व्यक्त केला आहे.

दरम्यान अपघाताची माहिती मिळताच पोलीस आणि स्थानिकांनी घटनास्थळी धाव घेतली. या घटनेनंतर नागरिकांमधून संताप व्यक्त होत असून, ट्रक चालकावर कारवाईची मागणी करण्यात येते आहे.

भरधाव ट्रक कोळसा घेऊन समुद्रपूरच्या दिशेने जात असताना उतारावर गाडी न्यूट्रल केली असल्यामुळे ट्रकवरील नियंत्रण सुटून हा अपघात झाल्याची प्राथमिक माहिती समोर येत आहे. नियंत्रण सुटलेल्या या ट्रकनं सुमारे आठ ते दहा गाईंना चिरडलं, या घटनेत या गाईंचा जागीच मृत्यू झाला. एका गाईची किंमत अंदाजे पन्नास ते साठ हजार रुपये आहे. यामध्ये गाईंच्या मालकाचं मोठं नुकसान झालं आहे.
इतर बातम्या
Join Whatsapp Group