राज्यात पुन्हा एकदा मुसळधार ! पावसाचा जोर वाढणार, ''या''  जिल्ह्यांना हायअलर्ट
राज्यात पुन्हा एकदा मुसळधार ! पावसाचा जोर वाढणार, ''या'' जिल्ह्यांना हायअलर्ट
img
दैनिक भ्रमर
 राज्यात आज हवामान खात्याकडून मुसळधार पावसाचा इशारा देण्यात आला आहे. गेल्या काही दिवसांपासून ब्रेक घेतल्या नंतर परतीच्या पावसाने राज्याला झोडपले होते. त्यानंतर पुन्हा एकदा राज्यात पावसाचा जोर वाढण्याची शक्यता आहे, राज्यात आज हवामान खात्याकडून मुसळधार पावसाचा इशारा देण्यात आला आहे.

मुंबई आणि उपनगरांमध्ये आज पुन्हा एकदा हवामान विभागाकडून जोरदार पावसाचा इशारा देण्यात आला आहे. मुंबईसह ठाण्यात आज मुसळधार पावसाची शक्यता वर्तवण्यात आली आहे.

तसेच,  कोकणामध्ये आज वादळी वारे आणि विजांच्या कडकडाटासह मुसळधार पावसाचा इशारा हवामान खात्याकडून देण्यात आला आहे. रायगड, सिंधुदुर्ग, रत्नागिरी आणि पालघरमध्ये या जिल्ह्यांना पावसाचा यलो अलर्ट देण्यात आला आहे.मराठवाड्यात देखील आज हवामान खात्याकडून जोरदार पावसाचा इशारा देण्यात आला आहे. मराठवाड्यातील छत्रपती संभाजीनगर, जालना, बीड, परभणी, हिंगोली आणि नांदेड या जिल्ह्यांमध्ये मुसळधार पावसाची शक्यता आहे.
इतर बातम्या
Join Whatsapp Group