राज्यात मे महिन्यात जोरदार हजेरी लावल्यानंतर पावसाने जुन महिन्यात मात्र ब्रेक घेतल्याचं दिसतंय. तर राज्यातील शेतकरी आता मान्सून सक्रीय कधी होणार? याची वाट पाहात आहेत. पेरण्या खोळंबल्या आहेत. उत्तर महाराष्ट्र अन् विदर्भातील काही जिल्ह्यांमध्ये अजून मान्सून दाखल झालेला नाही. याच अनुषंगाने हवामान विभागाने महत्वाची माहिती दिली आहे.
राज्यात 13 जूनपासून मान्सून पुन्हा सक्रीय होणार असल्याचं हवामान विभागाने सांगितलं आहेत. तसेच राज्यातील काही जिल्ह्यांमध्ये 9 अन् 10 जून रोजी हलक्या ते मध्यम स्वरूपाच्या पावसाचा अंदाज वर्तविण्यात आलाय. कोकण-गोव्यात काही ठिकाणी तर मध्य महाराष्ट्र, मराठवाडा आणि विदर्भात तुरळक ठिकाणी मेवादळी वाऱ्यासह पाऊस पडणार असल्याचं कळतंय.
भारतीय हवामान विभागाने काही जिल्ह्यांमध्ये जोरदार पावसाचा अंदाज वर्तविला आहे. घाट विभागात पावसाचा यलो अलर्ट आयएमडीकडून देण्यात आलाय.
आज कुठे कोसळणार पावसाच्या सरी?
कोकण, मध्य महाराष्ट्रात हलका ते मध्यम स्वरूपाचा पाऊस पडत आहेत. तर राज्यातील इतर जिल्ह्यांमध्ये विजासंह पावसाचा अंदाज कायम आहे. कोकणातील रत्नागिरी, सिंधुदुर्ग, मध्य महाराष्ट्रातील अहिल्यानगर, सोलापूर, पुणे, सातारा, सांगली, मराठवाड्यातील बीड, नांदेड, धाराशिव, लातूर, जिल्ह्यात विजासंह वादळी पावसाचा यलो अलर्ट देण्यात आलाय. विदर्भामध्ये मुख्यतः कोरड्या हवामानासह हलका पाऊस पडण्याचा अंदाज हवामान विभागाने वर्तविला आहे.