नागरिकांनो सावधान!  राज्याच्या विविध भागात आजपासून पावसाचा जोर वाढणार , कोणत्या भागात कधीपर्यंत पडणार पाऊस?
नागरिकांनो सावधान! राज्याच्या विविध भागात आजपासून पावसाचा जोर वाढणार , कोणत्या भागात कधीपर्यंत पडणार पाऊस?
img
Dipali Ghadwaje
परतीच्या पावसाने राज्यात धुमाकूळ घातला आहे. सोयाबीन, भात, बाजरीचे नुकसान झाले आहे. राज्याच्या विविध भागात अनेक ठिकाणी नदी नाले दुथडी भरुन वाहत आहेत. तसेच ज्या भागात अतिवृष्टी झालीय, त्या भागात शेती पिकांना मोठा फटका बसला आहे. दरम्यान, हा परतीचा पाऊस आणखी किती दिवस राहणार? याबाबतची माहिती समोर आली आहे. 

मिळालेल्या माहितीनुसार, आजपासून राज्याच्या विविध भागात पुन्हा पावसाचा जोर वाढणार आहे. 9 ऑक्टोबर ते 17 ऑक्टोबरपर्यंत राज्यात जोरदार पाऊस पडण्याची शक्यता आहे. या पावसाच्या पार्श्वभूमीवर  शेतकऱ्यांना सावधानतेचा इशारा देण्यात आला आहे. ज्या शेतकऱ्यांनी सोयाबीन, उडीद काढला आहे किंवा केला आहे, त्या शेतकऱ्यांनी ते झाकून ठेवावे, अन्यथा पावसाचा फटका बसू शकतो. सध्या बऱ्याच शेतकऱ्यांच्या या पिकांच्या काढणी सुरु आहेत. अशातच पाऊस आल्यास शेती पिकांना फटका बसण्याची शक्यता आहे. 

या भागात होणार जोरदार पाऊस

आजपासून मराठवाडा, उत्तर महाराष्ट्र, पश्चिम महाराष्ट्र आणि कोकण या भागात रोज भाग बदलत विजांच्या कडकडाटासह जोरदार पाऊस पडण्याची शक्यता आहे. तर 12 ऑक्टोबरपासून विदर्भात पावसाला सुरुवात होणार आहे, 12 ते 16 ऑक्टोबर या काळात विदर्भात जोरदार पावसाची शक्यता वर्तवण्यात आली आहे.

दरम्यान नांदेड, परभणी, हिंगोली, लातूर, बीड, जालना या सहा जिल्ह्यांमध्ये जास्त पावसाची शक्यता आहे. तर पुणे, सातारा, सांगली, कोल्हापूर, नगर, नाशिक, नंदुरबार, धुळे, जळगाव या जिल्ह्यातही पावसाचा जोर अधिक राहणार असल्याची शक्यता आहे. 

दरम्यान, परतीचा पाऊस हा गहू आणि हरभरा पिकांसाठी वरदान ठरणार आहे. रब्बी हंगामात मोठ्या प्रमाणात गहू आणि हरभरा या पिकांचं उत्पादन घेतलं जातं. हा परतीचा पाऊस दोन पिकांसाठी फायदेशीर ठरणार आहे. मात्र, दुसऱ्या बाजूला परतीच्या पावसाची अनेक ठिकाणी शेती पिकांना मोठा फटका बसत असल्याचं चित्र पाहायला मिळत आहे. सोयाबीन, उडीद, भाजीपाला, तूर, कांदा या पिकांचं नुकसान झालं आहे.

 
इतर बातम्या
Join Whatsapp Group