मोठी दुर्घटना :  रेल्वेला भीषण आग, दोन डबे जळून खाक, जीव वाचवण्यासाठी प्रवाशांनी....
मोठी दुर्घटना : रेल्वेला भीषण आग, दोन डबे जळून खाक, जीव वाचवण्यासाठी प्रवाशांनी....
img
Dipali Ghadwaje
अहमदनगर: अहमदनगर आष्टी रेल्वेला भीषण आग लागली आहे. रेल्वेच्या दोन डब्यांमध्ये ही आग भडकली असून धुराचे लोट सर्वत्र पसरले आहेत. आग आटोक्यात आणण्यासाठी शर्थीचे प्रयत्न सुरू आहेत. आग नेमकी कशामुळे लागली याबाबत अद्याप कोणतीही माहिती समोर आलेली नाही.

याबाबत मिळालेली माहिती अशी की, अहमदनगर आष्टी रेल्वेला नगर तालुक्यातल्या शिराडोह परिसरात आग लागली. रेल्वेच्या दोन डब्यांमध्ये ही आग भडकली आहे. सुदैवाने यामध्ये कोणतीही जिवितहानी झालेली नाही अशी माहिती समजते. आग लागल्याच्या घटनेनंतर पोलीस आणि रेल्वे प्रशासन घटनास्थळी दाखल झाले. अग्निशमन दलाच्या गाड्या आग आटोक्यात आणण्यासाठी प्रयत्न करत आहेत. या आगीत रेल्वेचं प्रचंड नुकसान झालं आहे. सध्यातरी ही आग नियंत्रणात आणण्यासाठी यद्धपातळीवर प्रयत्न केले जात आहेत. 

ही आग नेमकी कशामुळे लागली आहे याची चौकशी करण्यात येणार आहे. आज संध्याकाळी साडे तीन ते चार वाजण्याच्या सुमारास ही आग लागल्याची माहिती आहे. या ठिकाणी आता अग्निशमन दल पोहोचलं असून आगीवर नियंत्रण मिळवण्यासाठी प्रयत्न सुरू आहेत.  या रेल्वेमधील प्रवासी हे बाहेर पडल्याने कोणतीही जीवितहानी झालेली नाही. तसेच या गाडीला प्रवाशांचा तेवढा प्रतिसाद नसल्याने गोंधळही झाला नाही. रेल्वेच्या दोन डब्यांना लागलेली ही आग सध्या पसरत असल्याचं चित्र आहे. पण रेल्वे प्रशासन आणि पोलिसांकडून ही आग विझवण्यासाठी शर्थीचे प्रयत्न सुरू आहेत. 

इतर बातम्या
Join Whatsapp Group