धाराशिव : धाराशिवमधून एक हृदयद्रावक घटना समोर आली आहे. तीन दिवसांवर लग्न होतं, त्याअगोदरच विजेचा शॉक लागून एका तरुणाचा दुर्दैवी मृत्यू झाला आहे.
जिल्ह्यातील परंडा तालुक्यातील जाकेपिंपरी येथे ही दुर्दैवी घटना घडली आहे. तरुणाच्या मृत्यूनं सर्वत्र हळहळ व्यक्त करण्यात येत आहे.
मिळालेल्या माहितीनुसार , भैरवनाथ लांडगे असं मृत युवकाचं नाव असून २२ जून रोजी भैरवनाथचा विवाह होणार होता. विद्यूत खांबाच्या लाईनवरील स्विच बदलताना शॉक लागून ही दुर्दैवी घटना घडली आहे.