धक्कादायक! चारित्र्याच्या संशयावरून झोपेतच केली पत्नीची हत्या, रात्रीच उरकला अंत्यसंस्कार ; काय आहे नेमंक प्रकरण?
धक्कादायक! चारित्र्याच्या संशयावरून झोपेतच केली पत्नीची हत्या, रात्रीच उरकला अंत्यसंस्कार ; काय आहे नेमंक प्रकरण?
img
Dipali Ghadwaje
सोलापूर : सोलापूरमधून धक्कादायक घटना समोर आली आहे. सोलापूर जिल्ह्यातील तेलगाव भीमा येथे पतीने पत्नीच्या डोक्यात दगड घालून हत्या केल्याची धक्कादायक घटना समोर आली आहे. या घटनेने तेलगाव भीमा येथे खळबळ उडाली आहे.

मिळालेल्या माहितीनुसार , भाग्यश्री बसवराज कोळी असे हत्या केलेल्या महिलेचे नाव आहे. या प्रकरणी फिर्यादी चंद्रकांत कोळी यांनी पोलिसांत धाव घेतली. त्यानंतर पोलिसांनी पती बसवराज आडव्याप्पा कोळी, शिवानंद आडव्यापा कोळी आणि गजानन आडव्यापा कोळी यांच्या विरोधात गुन्हा नोंदवण्यात आला आहे. पोलिसांनी या प्रकरणाचा अधिक तपास सुरु केला आहे.


काय आहे नेमंक प्रकरण? 

बसवराज कोळी आणि भाग्यश्रीचा २०१४ साली विवाह झाला होता. मागील दोन वर्षांपासून कोळी कुटुंब निम्बर्गीतील शेतात राहत होतं. काही दिवसांपूर्वी बसवराज सासरवाडी लोणीला आला. त्यानंतर त्याने सासरवाडीला पत्नी काही काम करत नाही.ऐकत नाही. नेहमी भांडत असल्याची तक्रार दिली. त्यानंतर बसवराजने मेव्हणा चंद्रकांत कोळीला तेलगावला बोलावून घेतले.

बसवराजने मेव्हण्याला तुझ्या बहिणीचे चारित्र्य चांगले नसल्याचे सांगितले. निंबर्गी येथील तिचे अनैतिक संबंध असल्याचे सांगितले. पत्नी २३ जूनला रविवारी रात्री झोपल्यानंतर बसवराजने तिच्या डोक्यात दगड घालून तिची हत्या केल्याची माहिती फिर्यादीने पोलिसांनी सांगितली. या प्रकरणाचा पुढील तपास सहायक पोलीस निरीक्षक प्रशांत हुले करत आहेत.

 
इतर बातम्या
Join Whatsapp Group