"ती" आत्महत्या शेअर मार्केट नव्हे तर वेगळ्याच कारणातून? ; सुनेच्या दाव्याने नवा ट्विस्ट
img
Dipali Ghadwaje
शेअर मार्केटमध्ये मोठ्या प्रमाणात नुकसान होऊन कर्जबाजारी झाल्यानेच हरीश मेहता आणि त्यांचा मुलगा जय मेहता यांनी मृत्यूला कवटाळल्याचं बोललं जात होतं. मात्र या प्रकरणात आता हरीश मेहता यांच्या सुनेनं केलेल्या दाव्यामुळे नवा ट्विस्ट निर्माण झाला आहे.

वसईच्या वसंतनगरी भागात राहणारे हरीश मेहता, त्यांचा मुलगा जय मेहता या दोघांनी सोमवारी भाईंदर रेल्वे स्थानकातून नायगावच्या दिशेने रेल्वे रुळावरून जात लोकलखाली आत्महत्या केली होती. भाईंदर रेल्वे स्थानकावर पित्रा-पुत्राने केलेल्या आत्महत्येचा व्हिडिओ सोशल मीडियात व्हायरल होताच समाजमन सुन्न झालं होतं.  वसई रेल्वे पोलिसांनी खात्री पटल्यानंतर मृतांची ओळख नमूद केली. मंगळवारी रात्री हरीश व जय यांचे मृतदेह नातलगांनी ताब्यात घेतले होते. 

दरम्यान, मेहता कुटुंबियांच्या घरातून पोलिसांना इंग्रजी भाषेत लिहलेली चिठ्ठी सापडली आहे. त्यामध्ये या प्रकरणास आम्ही जबाबदार आहोत असे लिहिलेले आहे. त्यामुळे ही नेमकी आत्महत्या आहे की अन्य  कोणते प्रकरण ? याचा शोध पोलीस घेत आहेत. पोलिसांनी देखील मयत मेहता यांचे बँक तपशील, ईमेल, मोबाईल तपासले असता त्यात कर्ज असल्याचे आढळून आले नाही.

सुनेनं काय म्हटलं आहे?

भाईंदर रेल्वे स्थानकाजवळ लोकलखाली आत्महत्या करणाऱ्या पिता-पुत्राच्या आत्महत्येमागचे कारण वसई रेल्वे पोलिस शोधत आहेत. मुलाच्या पत्नीकडे चौकशी केली असता तिने कर्ज नसल्याचे पोलिसांना सांगितले. त्यामुळे पोलिस मयत पिता पुत्राचे मोबाइल तपासत असून, अन्य निकटवर्तीयांकडेही चौकशी सुरू आहे. 

पोलिसांनी जय आणि हरीश यांच्या मोबाइलची तपासणी चालवली असून, त्यात हरीश हे शेअर मार्केटचे काम करीत असल्याचे आढळून आले आहे. परंतु, आत्महत्येबाबतचे ठोस कारण त्यातून निदर्शनास आलेले नाही. कर्ज वा कौटुंबिक वाद असल्याचे अजून तरी समोर आलेले नसून जय यांच्या पत्नीनेही कर्ज नसल्याचे सांगितले आहे. मेहता पिता-पुत्राच्या मोबाइलची तपासणी सुरू आहे. आत्महत्येचे कारण स्पष्ट झालेले नाही. 
इतर बातम्या
Join Whatsapp Group