'इंडिया आऊट' म्हणणारे मालदीवचे राष्ट्राध्यक्ष येणार भारत दौऱ्यावर
'इंडिया आऊट' म्हणणारे मालदीवचे राष्ट्राध्यक्ष येणार भारत दौऱ्यावर
img
Dipali Ghadwaje
भारताशी पंगा घेणे मालदीवला चांगलेच महागात पडले आहे. मालदीवची अर्थव्यवस्था संकटात आली आहे. मालदीवकडे आता दीड महिना पुरेल इतकीच परकीय गंगाजळी आहे. देशासमोर संकट येताच चीनचे मित्र असलेले मालदीवचे राष्ट्रपती मोहम्मद मुइज्जू वठणीवर आले आहे. आता ते पुन्हा भारत दौऱ्यावर आले आहेत.

गेल्या चार महिन्यात त्यांचा हा दुसरा भारत दौरा आहे. दोन्ही राष्ट्रांमधील संबंध अधिक दृढ करण्यासाठी आणि द्विपक्षीय संबंध वाढवण्यासाठी मुइज्जू भारतात येत आहेत.

मालदीवची परकीय गंगाजळी आता 40 कोटी डॉलरवर आली आहे. त्यात फक्त दीड महिन्यांचा खर्च चालणार आहे. मालदीवने ‘इंडिया आऊट’चा नारा दिला होता. तसेच मालदीव सरकारमधील मंत्र्यांनी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्यावर टीका केली होती. त्यामुळे भारतीयांनी मालदीवच्या पर्यटनावर बहिष्कार टाकण्याची मोहीम सोशल मीडियावर सुरु केली होती. भारतीयांच्या या मोहिमेमुळे मालदीवचे पर्यटन क्षेत्र संकटात आले.

मुइज्जू यांनी भारतात येण्यापूर्वी वक्तव्य केले आहे. ते म्हणाले, मालदीव आर्थिक संकटात आहे. आम्हाला आशा आहे, भारत आमची मदत करेल. मालदीव सरकारच्या वेबसाइटवर मुइज्जू यांची भारत यात्रेसंदर्भात एक विशेष पान बनवण्यात आले आहे. त्यात मुइज्जू यांच्या दौऱ्याची सर्व माहिती दिली आहे.

या सहा विभागात मालदीव भारतावर अवलंबून?

मालदीवला 1965 मध्ये स्वातंत्र मिळाले. त्यानंतर मालदीव भारतावर अनेक गोष्टींवर अवलंबून राहिला आहे.

संरक्षण क्षेत्रात 1988 पासून भारत मालदीवला मदत करत आहेत. मालदीवच्या नॅशनल डिफेन्स फोर्सला 70 टक्के सामान भारतच देतो.

मालदीवमधील पायाभूत सुविधा क्षेत्रात भारताची महत्वाची भूमिका राहिली आहे. मालदीवचा ग्रेटर माले कनेक्टिविटी प्रोजेक्ट त्याचे उदाहरण आहे. या प्रकल्पात भारताने 50 कोटी डॉलरची गुंतवणूक केली आहे.

आरोग्य सेवेत भारतावर मालदीव अवलंबून आहे. मालदीवमध्ये इंदिरा गांधी मेमोरियल हॉस्पिटलसाठी भारताने 52 कोटी रुपये दिले आहे. तसेच आणखी एक कॅन्सर हॉस्पिटल भारत सुरु करत आहे.

शिक्षणात भारताने मालदीवला 1996 मध्ये टेक्निकल एजुकेशन इंस्टीट्यूट उघडण्यासाठी मदत केली. भारताच्या मदतीने मालदीवमध्ये 53 लाख डॉलरचा व्हेकेशनल ट्रेनिंग प्रोजेक्ट सुरु आहे.

भारत आणि मालदीवमधील व्यापार 2014 नंतर चार पट वाढला. 2022 मध्ये दोन्ही देशांतील व्यापार 50 कोटी डॉलर होती. यापूर्वी 2014 मध्ये हा व्यापार 17 कोटी डॉलर होता.

पर्यटनावर मालदीव पूर्णपणे भारतीयांवर अवलंबून आहे. मालदीवमध्ये जाणाऱ्या पर्यटकांमध्ये सर्वाधिक पर्यटक भारतातील आहे. परंतु आता भारतीय पर्यटकांनी मालदीववर बहिष्कार टाकला आहे.
इतर बातम्या
Join Whatsapp Group