२२ जानेवारी २०२५
महाराष्ट्रात गेल्या काही दिवसापासून हवामानात बदल दिसून आले आहेत. राज्यात पुढील पाच दिवस कोरड्या वाऱ्यांचा प्रवाह सक्रिय राहणार असल्याचा अंदाज हवामान विभागाने लावला आहे.
काही दिवसांपासून राज्यात पहाटे प्रचंड गारठा आणि दुपारी तीव्र उन्हाचा चटका यांचा अनुभव नागरिक घेत आहेत. तसेच पुणे आणि इतर मध्य महाराष्ट्रातील काही भागांत किमान तापमान 1 ते 3 अंशांनी वाढले असून, तापमान स्थिरावले आहे. त्यामुळे महाराष्ट्रातील हवामान पुढील पाच दिवस कोरड्या वाऱ्यांचा प्रभाव दिसणार आहे .
हवामान विभागाने दिलेल्या माहितीनुसार, राज्यातील तापमानात सुधारणा होण्याची शक्यता आहे. प्रामुख्याने मराठवाड्यात पुढील 3 ते 4 दिवसात किमान तापमानात 2 ते 3 अंशांची वाढ होईल. त्यानंतर हळूहळू तापमान कमी होईल. विदर्भात मात्र, पुढील 48 तास तापमानात फारसा बदल होणार नाही.
Copyright ©2025 Bhramar