राजीनामा दिल्यानंतर धनंजय मुंडे यांनी दिली ''ही'' पहिली प्रतिक्रिया
राजीनामा दिल्यानंतर धनंजय मुंडे यांनी दिली ''ही'' पहिली प्रतिक्रिया
img
दैनिक भ्रमर
बीडमधील मस्साजोगचे सरपंच संतोष देशमुख यांच्या हत्याप्रकरणानंतर धनंजय मुंडे यांच्यावर टीका झाली. तसेच त्यांनी मंत्रीपदाचा राजीनामा द्यावा अशी मागणी विरोधकांकडून केली जात होती. दरम्यान राष्ट्रवादी काँग्रेसचे मंत्री धनंजय मुंडे यांनी अखेर राजीनामा दिला आहे. राजीनाम्यानंतर धनंजय मुंडे  यांनी ट्विट करत पहिली प्रतिक्रिया दिली आहे. सदसद् विवेक बुद्धीला स्मरून आणि वैद्यकीय कारणास्त्व सुद्धा धनंजय मुंडे यांनी राजीनामा दिल्याचं म्हटलं आहे.


बीड जिल्ह्यातील मस्साजोगचे संतोष देशमुख यांच्या निर्घृण हत्येतील आरोपींना कठोरात कठोर शिक्षा व्हावी, ही माझी पहिल्या दिवसापासूनची ठाम मागणी आहे. काल समोर आलेले फोटो पाहून तर मन अत्यंत व्यथित झालं, असं धनंजय मुंडे म्हणाले आहेत. या प्रकरणाचा तपास पूर्ण झाला असून आरोपपत्र न्यायालयात दाखल झाले आहे. तसेच, न्यायालयीन चौकशीही प्रस्तावित आहे, असंही धनंजय मुंडे म्हणाले.

माझ्या सदसद् विवेक बुद्धीला स्मरून आणि मागील काही दिवसांपासून माझी प्रकृती ठीक नसल्याने पुढील काही दिवस उपचार घेण्याचा सल्ला डॉक्टरांनी दिला आहे. त्यामुळे वैद्यकीय कारणास्तव सुद्धा मी मंत्रिमंडळातून माझ्या मंत्रिपदाचा राजीनामा मुख्यमंत्री महोदयांकडे दिला आहे, असं धनंजय मुंडे यांनी म्हटलं आहे.

दरम्यान, धनंजय मुंडे यांनी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्याकडे राजीनामा सोपवला, तसेच देवेंद्र फडणवीस यांनी देखील राजीनामा स्विकारला आहे. पुढील प्रक्रियेसाठी राज्यपालांकडे राजीनामा देण्यात आला आहे, असं मुख्यमंत्र्यांनी सांगितलं.

इतर बातम्या
Join Whatsapp Group