काल काश्मीरमधील पहलगाममध्ये दहशतवादी हल्ला झाला. या दहशतवादी हल्ल्यात २८ जणांचा मृत्यू झाला आहे. तर प्रसंगावधनतेमुळे काही लोकांचा जीव वाचला आहे. यात सध्या बुलढाणा जिल्ह्यातील पाच जण पहेलगाम मध्ये अडकले आहेत. काल पहेलगाम मध्ये फायरिंग झाली तेव्हा पाच जण तेथील हॉटेल मधेच होते.
बुलढाण्यातली हे पाचजण हॉटेलबाहेर पडणार होते तेव्हाच हॉटेल मालकाने त्यांना थांबवले.त्यांना सांगितले की, फायरिंग सुरु झाली आहे. बाहेर फिरायला पडू नका. बुलढाण्यातील पाच जण 18 तारखेला फिरायला जम्मू काश्मीर मध्ये गेले होते.यामध्ये तीन पुरुष व दोन महिला आहेत.
जेव्हा फायरिंग होत होती तेव्हा बुलढाण्यातील कुटुंब तिथेच हॉटेलमध्ये होते. फायरिंगच्या आवाजाने परिवार खूप घाबरला होता. सध्या हे कुटुंब जैन परिवार हॉटेल मध्येच आश्रयला आहे. एकूण 5 लोक आहेत. यामध्ये २ महिला , ३ पुरुषांचा समावेश आहे.
काश्मीरमध्ये अडकलेल्या या पाच जणांची नावे निलेश जैन, पारस अरुण जैन, ऋषभ अरुण जैन, सौ श्वेता निलेश जैन, अनुष्का निलेश जैन अशी आहेत.
18 तारखेला हे कुटुंब मुंबईहून काश्मीरला निघाले होते. जम्मू काश्मीर मधील सर्व ठिकाणी फिरुन झाल्यानंतर 21 तारखेला रात्री पहलगामध्ये हॉटेलला आले. 22 ला सकाळी पहलगामध्ये फिरायला निघणार तेवढ्यात हॉटेलच्या लोकांनी गोळीबार झाल्याचे व बाहेर न पडण्यास सांगितले. आता हे कुटुंब सुखरूप असल्याची माहिती मिळत आहे.