भीषण अपघात : कांदा काढणीला निघालेल्या मजुरांचा पिकअप पलटला, 3 महिला ठार 15 जखमी ; नेमकं काय घडलं?
भीषण अपघात : कांदा काढणीला निघालेल्या मजुरांचा पिकअप पलटला, 3 महिला ठार 15 जखमी ; नेमकं काय घडलं?
img
Dipali Ghadwaje
रस्ते अपघातांचे प्रमाण वाढत चालले असून , बीडच्या आष्टी तालुक्यातील धामणगाव येथे कांदा काढण्यासाठी निघालेल्या महिला मजुरांच्या पिकप वाहनाचा भीषण अपघात झाला असून  या अपघातात तीन महिलांचा जागीच मृत्यू झाला तर 15 महिला गंभीर जखमी झाल्या आहेत.  कामगार दिनाच्या दिवशी महिला मजुरांच्या मृत्यूमुळे  मोठी खळबळ उडाली आहे.

याबाबत मिळालेल्या माहितीनुसार , हा अपघात बीड अहिल्यानगर महामार्गावरील धामणगाव परिसरात झाला.  गुरूवारी सकाळी साडेदहाच्या दरम्यान हा अपघात घडलाय.   अपघात घडल्याचे समजता पोलीस आणि स्थानिक प्रशासन घटनास्थळी दाखल झाले .जखमींना रुग्णालयात हलवण्याची व्यवस्था करण्यात आली. या अपघातात पलटी झालेल्या वाहनाचा चक्काचूर झाला आहे . 

नेमकं काय घडलं ? 

बीडच्या आष्टी तालुक्यातील धामणगाव येथे कांदा काढण्यासाठी सकाळीच महिला मजुरांचा एक गट पिकअप वाहनातून निघाला होता . मात्र धामणगाव परिसरात अचानक वाहनाचा टायर फुटला आणि चालकाचे नियंत्रण सुटल्याने पिकअप पलटी झाला .या पिकअप मध्ये साधारण 18-20 महिला होत्या .टायर फुटल्यानंतर चालकाचे नियंत्रण सुटले .वाहन रस्त्याच्या कडेला उलटले .या भीषण अपघातात जागीच तीन महिलांचा मृत्यू झाला .तर पंधरा महिला गंभीर जखमी झाल्या आहेत. अपघात झाल्याची माहिती स्थानिकांनी पोलिसांना कळवली .

त्यानंतर पोलीस आणि स्थानिक प्रशासन घटनास्थळी दाखल झाले होते .जखमी महिलांना तातडीने उपचारासाठी रुग्णालयात हलवण्याची व्यवस्था करण्यात आली आहे. अपघाताचे नेमके कारण जाणून घेण्यासाठी चौकशी सुरू करण्यात आली असून टायर फुटल्यामुळे वाहन पलटल्याचा प्राथमिक अंदाज व्यक्त करण्यात आलाय .

कामगार दिनाच्या दिवशी मजुरीसाठी निघालेल्या महिलांचा जीव गेल्याच्या घटनेनंतर परिसरात हळहळ व्यक्त केली जात आहे .

 
 
 
 
 
इतर बातम्या
Join Whatsapp Group