"मुंबई तुंबली अन् आनंद दिघे स्वप्नात आले ; एकनाथ कुठय"? संजय राऊतांचा शिंदेंवर घणाघात ; नेमकं काय म्हणाले....
img
Dipali Ghadwaje
गेल्या दोन दिवसांत मुंबईत जोरदार पाऊस झाला. रात्रभर पावसाचा मारा सुरूच होता. त्यामुळे मुंबईत अनेक ठिकाणी पाणीच पाणी झाल्याचं पाहायला मिळालं. यामुळे रुग्णालयासह रेल्वे आणि रस्ते वाहतूक देखील विस्कळीत झाली होती. यावर आता संजय राऊत यांनी आज (दि.२७) रोजी पत्रकार परिषदेत बोलताना उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्यावर प्रहार केलाय.


मुंबईत काल महापूर आला. ही जबाबदारी कुणाची आहे तर एकनाथ शिंदेंची आहे. ते नगरविकासमंत्री आहेत. महापालिका कुणाकडे आहे? मुंबई तुंबली तेव्हा आनंद दिघे अनेकांच्या स्वप्नात गेले, विचारलं एकनाथ कुठे आहे? मुंबई आणि ठाणे बुडालं एकनाथ कुठंय? एकनाथ शिंदे अमित शाहांचं लांगुणचालन करण्यात व्यस्त आहेत. एकनाथ कुठंय तर महाराष्ट्र द्रोह्यांच्या लांगुणचालनात व्यस्त आहे असा थेट घणाघात संजय राऊत यांनी केलाय.

 
इतर बातम्या
Join Whatsapp Group