केंद्र सरकारने महत्त्वाचा निर्णय  : कॅनेडियन नागरिकांना भारताचा दिलासा....
केंद्र सरकारने महत्त्वाचा निर्णय : कॅनेडियन नागरिकांना भारताचा दिलासा....
img
Dipali Ghadwaje
नवी दिल्ली : खलिस्तानवादी नेता हरदीपसिंग निज्जर याच्या हत्येत भारताचा सहभाग असल्याचा गंभीर आरोप कॅनडाचे पंतप्रधान जस्टिन ट्रुडो यांनी केला होता. या आरोपानंतर भारत आणि कॅनडा या दोन देशांमधील राजनैतिक संबंध ताणले गेले आहेत. जस्टिन ट्रुडो सातत्याने भारतावर आरोप करत आहेत, तसेच त्यांच्याकडे भारताविरोधातले पुरावे असल्याचा दावा करत आहेत. भारताने ट्रुडो यांचे सगळे आरोप फेटाळून लावले आहेत.

दरम्यान, भारताने २१ सप्टेंबर रोजी कॅनडाच्या नागरिकांना व्हिसा देण्याची सेवा तात्पुरती थांबवण्याचा निर्णय घेतला होता. गेल्या दोन महिन्यांपासून ही सेवा बंद आहे. दरम्यान,  भारत आणि कॅनडामध्ये सुरु असलेल्या तणावाच्या पार्श्वभूमीवर केंद्र सरकारने महत्त्वाचा निर्णय घेतला आहे.  भारताने आता कॅनेडियन नागरिकांसाठी ई-व्हिसा सेवा पुन्हा सुरू  करण्याचा निर्णय घेतला आहे.  

खलिस्तानी दहशतवादी निज्जर यांची हत्या भारतीय गुप्तहेर एजेन्सीने केल्याचा आरोप कॅनडाने केला होता. भारताने हे आरोप फेटाळून लावले होते. कॅनडाच्या दाव्यामुळे दोन्ही देशांमध्ये संबंध आतापर्यंतच्या सर्वात खालच्या स्तरावर गेले होते. भारताने दोन महिन्यांपूर्वी कॅनडियन नागरिकांना व्हिसा देण्यास बंदी आणली होती. कॅनडाने या निर्णयामुळे नाराजी व्यक्त केली होती.

कॅनडासोबतचे संबंध सुधारण्यासाठी भारताने हे सकारात्मक पाऊल उचललं असल्याचं बोललं जात आहे. व्यावसायिक कामासाठी अनेक कॅनडियन नागरिक भारतात येत असतात. भारत सरकारच्या या निर्णयामुळे त्यांना दिलासा मिळणार आहे.
 
भारत सरकारने काही विशिष्ठ श्रेणीतील नागरिकांसाठी व्हिसा सेवा सुरु करण्याचा निर्णय यापूर्वी घेतला होता. त्यानंतर आता ई-व्हिसा सेवा सुरु करण्याचा निर्णय घेण्यात आला आहे. या निर्णयामुळे कॅनडियन नागरिकांना भारतीय आयुक्तालयात न जाता ऑनलाईन पद्धतीने व्हिसासाठी अप्लाय करता येणार आहे.  
इतर बातम्या
Join Whatsapp Group