अपघाताच्या घटनांमध्ये दिवसेंदिवस वाढ होत आहे. अशातच हिंगोलीमध्ये आपल्या आई-वडिलांना दुचाकीवरुन रुग्णालयात घेऊन जाताना झालेल्या अपघातात मुलगा, आई-वडील असा तिघांचाही मृत्यू झाल्याची दुर्दैवी घटना समोर आली आहे. या दुचाकी अपघातात संपूर्ण कुटूंबच उध्वस्त झाल्याने हिंगोलीच्या डिग्रस वाणी गावातील या घटनेने संपूर्ण जिल्ह्यावर शोककळा पसरली आहे.

याबाबत मिळालेल्या अधिक माहितीनुसार, कुंडलिक जाधव, कलावती जाधव व मुलगा आकाश जाधव अशी मृतांची नावे आहेत. आकाश बुधवारी रात्री आपल्या वयोवृद्ध आई-वडिलांची तब्येत बिघडल्याने मुलगा त्यांना रुग्णालयात घेऊन जात होता. मात्र रुग्णालयात पोहोचण्याआधीच दुचाकीचा अपघात झाला. रात्रीच्यावेळी अपघात झाल्याने घटना उघडकीस आली नाही.
सकाळी अपघाताची घटना समोर आली. दुचाकी एका वळणावरून रस्त्याच्या शेजारील नाल्यात कोसळली आणि तिघेही दुचाकीसह नाल्यामध्ये पडले. मात्र या रस्त्यावरून रहदारी नसल्याने अपघाताची माहिती कुणालाच मिळाली नाही. त्यामुळे तिघांनाही रात्रभर मदत मिळाली नाही.
गुरुवारी सकाळी दूध विक्रेते जात असताना हा अपघात झाल्याचं त्यांच्या लक्षात आलं. त्यानंतर त्यांनी तातडीने ग्रामस्थांसह पोलिसांनी घटनेची माहिती दिली. पोलीस घटनास्थळी दाखल झाले, मात्र तोपर्यंत उशीर झाला होता. तीनही जणांना या अपघातात मृत्यू झाला होता.