जम्मू- काश्मीरमधील पहलगाममध्ये मंगळवारी दहशतवादी हल्ला झाला. या हल्यात दहशतवाद्यांनी पर्यटकांवर अंदाधुंद गोळ्या झाडल्या आहे. २६ पर्यटकांचा मृत्यू झालं आहे. विशेष म्हणजे ओळख आणि धर्म विचारून अंदाधुंद गोळ्या झाडण्यात आल्या आहे. या दहशतवादी हल्ल्यात ३१ वर्षीय शुभम द्विवेदी याचा मृत्यू झाला. त्याचे लग्न दोन महिन्यापूर्वीच झालं होत. पत्नी आणि इतर कुटुंबियांसोबत तो काश्मीरला फिरायला गेला होता. दहशतवाद्यांनी आधी त्याला त्याचा धर्म विचारला आणि कुराणमधील कलमा म्हणून दाखवण्यास सांगितलं.
३१ वर्षीय शुभम द्विवेदी हा कानपूर इथला व्यापारी होता. तो आपल्या पत्नी आणि ११ सदस्यांच्या फॅमिली ग्रुपसोबत काश्मीरला फिरायला गेला होता. शुभमचं लग्न दोन महिन्यांपूर्वी 12 फेब्रुवारी रोजी एशान्या द्विवेदीशी झालं होतं. लग्नानंतर शुभम आणि एशान्याची ही दुसरी ट्रिप होती आणि यावेळी त्यांनी कुटुंबियांसोबत फिरण्याचं ठरवलं होत. शुभम आणि एशान्याचे कुटुंबीयसुद्धा या ट्रिपमध्ये सहभागी होते.
शुभमच्या भावाने काय सांगितलं?
“शुभम आणि एशान्या हे घोडेस्वारी करत परिसरात फिरत होते, तेव्हाच दहशतवाद्यांनी हल्ला केला. सैन्याच्या वेशात असलेल्या एका अतिरेक्याने शुभमला विचारलं की, तू मुस्लीम आहे का? तर दुसऱ्याने त्याला कलमा म्हटल्यास सांगितलं. त्यावर शुभमने कलमा येत नसल्याचं सांगताच त्याला गोळी झाडली”, अशी माहिती शुभमचा चुलत भाऊ सौरभने दिली. “शुभमची पत्नी एशान्या अतिरेक्यांना म्हणाली की, मलासुद्धा मारून टाका. पण त्यांनी नकार दिला आणि म्हणाले जाऊन तुझ्या सरकारला सांग की आम्ही काय केलंय”, असं सौरभने सांगितलं.
काश्मीरमधील ‘मिनी स्वित्झर्लंड’ म्हणून ओळखल्या जाणाऱ्या बैसरन भागात मंगळवारी अतिरेक्यांनी पर्यटकांवर गोळीबार केला. गेल्या सहा वर्षातील काश्मीरमधील हा सर्वात मोठा दहशतवादी हल्ला होता.
सरन खोऱ्यात टेकडीवरून खाली उतरून दहशतवाद्यांनी पर्यटकांवर अंदाधुंद गोळीबार केला. तिथे जाण्यासाठी अरुंद वाट असल्याने पर्यटकांना आडोशाला जाण्याची संधी मिळाली नाही. जवळपास ४० पर्यटकांना घेरून लक्ष करण्यात आलं. रक्ताच्या थारोळ्यात पर्यटकांचे कुटुंबीय मदतीसाठी धाव करत होते. काही स्थानिकांनी पाठीवरून जखमींना रुग्णालयात दाखल केलं. या हल्ल्यात किमान २६ पर्यटकांचा मृत्यू झाला असून २० जण जखमी झाले आहे.