विलास शिंदे यांच्यासह
विलास शिंदे यांच्यासह "या" माजी नगरसेवकांचा शिवसेनेत प्रवेश
img
दैनिक भ्रमर
नाशिक :- उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या उपस्थितीत आज उध्दव बाळासाहेब ठाकरे गटाचे माजी महानगरप्रमुख विलास शिंदे यांच्यासह माजी सात नगरसेवक, सरपंच, उपसरपंच, ग्रामपंचायत सदस्यांनी शिवसेना पक्षात प्रवेश केला. 

यावेळी शिंदे यांच्यासह माजी नगरसेवक संतोष गायकवाड, नयना गांगुर्डे, विष्णुपंत बेंडकुळे, प्रवीण पाळदे, पल्लवी पाटील, निलेश ठाकरे, उषाताई शेळके यांनी शिवसेनेत प्रवेश केला.

तसेच उबाठा शिवसेनेचे उप महानगरप्रमुख निवृत्ती इंगोले, जिल्हा परिषद सदस्य सोमनाथ फडोळ, राष्ट्रवादी काँग्रेस तालुका अध्यक्ष मोहनीश दोंदे, उबाठा युवासेना तालुका अध्यक्ष सुनील मते, त्र्यंबकेश्वरचे सभापती खंडू भोये, सरपंच रमेश भोये, दिलीप चौधरी, इगतपुरीचे राष्ट्रवादी काँग्रेसचे उपाध्यक्ष दशरथ धांडे, राजेश मोरे, नितीन भागवत, दयाराम आहेर, संकेत सातभाई, सचिन कर्डीले यांच्यासह असंख्य पदाधिकाऱ्यांनी शिवसेनेमध्ये पक्षप्रवेश केला.

नाशिकहून शेकडो गाड्यांमध्ये शिंदे यांचे समर्थक प्रवेश सोहळ्यासाठी ठाण्याला गेले होते. भव्य शक्ती प्रदर्शन करत हा प्रवेश सोहळा पार पडला. 

याप्रसंगी शालेय शिक्षणमंत्री दादा भुसे, खा. नरेश म्हस्के, शिवसेना सचिव राम रेपाळे, उत्तर महाराष्ट्र सचिव भाऊसाहेब चौधरी, माजी खासदार हेमंत गोडसे, विजय करंजकर, जिल्हाप्रमुख भाऊलाल तांबाडे, महानगरप्रमुख प्रवीण तिदमे तसेच शिवसेना पदाधिकारी आणि शिवसैनिक मोठ्या संख्येने उपस्थित होते.

यावेळी बोलताना एकनाथ शिंदे यांनी ठाकरे गटाला व विशेष करून संजय राऊत यांना बरेच चिमटे घेतले. ते म्हणाले, आज विलास शिंदे यांचा पक्षप्रवेश होत असताना काहींनी कोण विलास शिंदे असा प्रश्न विचारला..? अयोध्येत जाताना त्यांना सोबत विलास शिंदे हवा होता, निवडणुकीत काम करताना विलास शिंदे हवा होता, वारंवार आपल्याला एकत्र काम करायचे आहे असं त्यांना सांगितले जात होते.

मात्र आता पक्षप्रवेश करणार हे निश्चित झाल्यावर कोण विलास शिंदे..? असा प्रश्न विचारला जात आहे. असेच धोरण राहिले तर एक दिवस तुम्ही कोण.? असा प्रश्न लोक विचारल्याशिवाय राहणार नाहीत. काही जण 'कम ऑन किल मी'.. म्हणत आहेत मात्र त्यांची अवस्था आज 'शोले' सिनेमातील असरानीसारखी झाली आहे.

त्यामुळे जेव्हा ते प्रत्यक्ष मैदानात लढायला उतरतील तेव्हा मागे कुणी राहील की नाही ते सांगता येत नाही. प्रत्येक दिवशी होणारी गळती थांबवायची कशी असा प्रश्न उबाठा यांना पडला आहे.

त्यामुळे ज्यांना संपलेला पक्ष म्हणत होते त्यांना अगतिक होऊन युतीसाठी प्रस्ताव पाठवत आहेत, असा टोलाही शिंदे यांनी लगावला.
इतर बातम्या
नाशिकरोडचे

Join Whatsapp Group