नाशिकरोड (भ्रमर प्रतिनिधी): जनतेचे कामे करायची आहे. शिवसेना उबाठा गटाने रिटायर करून ठेवल्यामुळे भाजपत जात असल्याचे शिवसेना उबाठा गटाचे नेते माजी मंत्री बबनराव घोलप यांनी सांगितले.
माजी मंत्री बबनराव घोलप हे शिवसेना उबाठा गटाचे उपनेते म्हणून काम करीत होते. गत लोकसभेचे निवडणुकी पूर्वी शिर्डी लोकसभा मतदारसंघातून उमेदवारी डावल्याने त्यांनी एकनाथ शिंदेच्या शिवसेना प्रवेश केला होता.
मात्र त्यानंतर त्यांनी तिथे जास्त काळ न राहता पुन्हा स्वगृही परतण्याचा निर्णय घेतला. विधानसभेत त्यांचे चिरंजीव माजी आमदार योगेश घोलप यांना उमेदवारी मिळाल्या नंतर त्यांनी पूर्ण वेळ काम करून देवळाली मतदार संघ ढवळून काढला होता.
मात्र शिवसेना उबाठात काही पद नाही, विश्वासात घेतले जात नाही असे सांगत त्यांनी मला रिटायर करून टाकल्याचे घोलप म्हणाले. जनतेचे कामे करायचे आहे. ते कामे होण्यासाठी सत्ता महत्त्वाची आहे. म्हणून भाजपात जाण्याचा निर्णय घेतला असल्याचे घोलप म्हणाले.
तसेच माजी नगरसेवक अशोक सातभाई हे देखील राष्ट्रवादी काँग्रेस शरद पवार गटात तून भाजपा मध्ये जाणार असल्याचे निश्चित झाले आहे. सातभाई हे पूर्वी हे शिवसेना उबाठा गटात काम करीत होते. नाशिकच्या माजी महापौर तसेच घोलप यांच्या कन्या नयना घोलप या देखील भाजपात प्रवेश करणार आहेत.
उद्या मुंबई येथे नाशिक मधील अनेक नेत्याचा पक्ष प्रवेश होणार आहे. भाजपा च्या गळाला अजून कोण कोण लागले हे आता उद्याच समजेल.