चक्रीवादळाचा कहर!  पुढील 24 तासांत राज्यात मेघगर्जनेसह अवकाळी पावसाचा अंदाज
चक्रीवादळाचा कहर! पुढील 24 तासांत राज्यात मेघगर्जनेसह अवकाळी पावसाचा अंदाज
img
Dipali Ghadwaje
मिचॉन्ग चक्रीवादळात देशासह राज्यात आजही पावसाची हजेरी पाहायला मिळणार आहे. बंगालच्या उपसागरात तयार झालेल्या मिचॉन्ग चक्रीवादळामुळे राज्यातील वातावरणावरही परिणाम झाल्याने अवकाळी पावसाची हजेरी पाहायला मिळत आहे. पुढील 24 तासांत राज्यात काही ठिकाणी मेघगर्जनेसह अवकाळी पावसाचा अंदाज हवामान विभागाने वर्तवला आहे.

राज्याच्या इतर भागात वातावरण कोरडं राहणार आहे, राज्यातील अनेक भागात अद्यापही थंडीची प्रतिक्षा आहे.  महाराष्ट्रात पुढील 24 तासांत विजांच्या गडगडाटासह पाऊस पडण्याची शक्यता हवामान विभागाने वर्तवली आहे. आज मराठवाड्यात काही ठिकाणी मेघगर्जनेसह पावसाच्या सरी कोसळण्याचा अंदाज आहे.

या भागात हलक्या ते मध्यम स्वरुपाचा पाऊस पडण्याची शक्यता आहे. नांदेड, सोलापूर, उस्मानााद, अहमदनगर, लातूर भागात अवकाळी पावसाची हजेरी पाहायला मिळणार आहे.

वर्ध्यात ढगाळ वतावरण; पावसाची शक्यता
वर्ध्यात दोन दिवसांपासून ढगाळ वातावरण आहे. आधीच अवकाळी पावसाने शेतकऱ्यांचे कंबरडे मोडले असताना पुन्हा ढगाळ वातावरणाने शेतकऱ्यांची चिंता वाढली आहे. ढगाळ वातवरण कायम राहत असल्याने याचा फटका तूर पिकाला बसतो आहे. अवकाळी पावसात तुरीचा बहार गळाला होता. आता ढगाळ वातवरण आणि त्यात पावसाची शक्यता वर्तविली जात असल्याने पुन्हा शेतीपिकाचे नुकसान होण्याची शक्यता आहे.

अवकाळी पावसामुळे द्राक्ष उत्पादकांचं नुकसान 
सांगली जिल्ह्यातील तासगाव तालुक्यातील द्राक्ष उत्पादक शेतकऱ्यांवर अवकाळी पावसामुळे मोठं संकट निर्माण झाले आहे. अवकाळी पावसामुळे आता द्राक्षाचे घड कुजू लागले आहेत. त्यामुळे हे द्राक्षे घड काढून टाकण्याची वेळ द्राक्ष उत्पादकांवर आली आहे.  तासगाव तालुक्यातील खुजगाव येथील शेतकरी महेश पाटील या शेतकऱ्याच्या द्राक्ष बागेला अवकाळीचा फटका बसल्यामुळे द्राक्ष बागेतील द्राक्ष काढून ओढ्यात टाकावी लागत आहेत. तासगाव तालुक्यासह जिल्ह्यात अवकाळी पावसामुळे द्राक्ष उत्पादकांचे मोठ्या प्रमाणात नुकसान झालं आहे. शासनाने याची दखल घेऊन भरीव आर्थिक मदत करावी आणि द्राक्ष उत्पादकासाठी कर्जमाफी द्यावी अशी मागणी होत आहे. द्राक्ष घड फेकून देण्याची वेळ आल्याने यंदा द्राक्षाच्या निर्यातीवर परिणाम होणार आहे.

थंडीची प्रतीक्षा कायम
डिसेंबर महिना उलटला तरी हवी तशी थंडी पडलेली नाही. आधी अरबी समुद्रात तयार झालेल्या कमी दाबाच्या पट्ट्यामुळे तर आता बंगालच्या उपसागरात तयार झालेल्या चक्रीवादळामुळे देशासह राज्यात अवकाळी पावसाचा कहर पाहायला मिळत आहे. यामुळे शेतकरी मात्र, रडकुंडीला आला आहे. अवकाळी पावसामुळे राज्यातील शेतकऱ्यांचं मोठ्या प्रमाणात नुकसान झालं आहे.


 

 
इतर बातम्या
Join Whatsapp Group