वीज मंडळाने केलेली दरवाढ तातडीने रद्द; औद्योगिक संघटनांकडून न्यायालयाच्या निर्णयाचे स्वागत
वीज मंडळाने केलेली दरवाढ तातडीने रद्द; औद्योगिक संघटनांकडून न्यायालयाच्या निर्णयाचे स्वागत
img
चंद्रशेखर गोसावी



नाशिक -  मुंबई उच्च न्यायालयाने महाराष्ट्र राज्य विद्युत मंडळाला दणका दिला असून नुकतीच केलेली वीज दरवाढ तातडीने रद्द करण्यात आली आहे. त्यामुळे राज्यातील घरगुती आणि औद्योगिक व्यवसायिक वापर करणाऱ्या नागरिकांना मोठा दिलासा मिळाला आहे. 

याबाबत अधिक माहिती अशी की, राज्य वीज मंडळ आयोगाने जुलै 2025 पासून राज्यामध्ये घरगुती व्यवसायिक आणि औद्योगिक क्षेत्रातील विजेचे दर वाढविले होते. त्यामुळे मोठ्या प्रमाणावर घरगुती ग्राहकांबरोबरच व्यवसायिक आणि विशेष करून उद्योग क्षेत्राला याचा मोठा फटका बसला होता. त्यामुळे उद्योजकांमध्ये मोठ्या नाराजीचे वातावरण पसरलेले होते. या सर्व प्रश्नावर राज्यातील उद्योजक न्यायालयात गेलेले होते. 

वीज मंडळाने आयोगाच्या शिफारशीनुसार लागू केलेल्या या वीज दरवाढीच्या परिणाम हा येणाऱ्या काही दिवसांमध्ये दिसण्याची शक्यता होती. त्यामुळे  वीज मंडळा विरोधात असलेल्या या याचिकेवर तातडीने सुनावणी सुरू होती. या सुनावणीचा निकाल आज मुंबई उच्च न्यायालयात देण्यात आला असून मुंबई उच्च न्यायालयाने तातडीने जुलै 25 पासून लागू करण्यात आलेली वीज दरवाढ रद्द करण्याचे आदेश दिले आहेत.

त्यामुळे उद्योजकांना मोठा दिलासा मिळाला आहे तर घरगुती ग्राहकांनाही त्याचा फायदा होणार आहे.  नाशिक मधील आयमा, निमा, यासह अन्य संघटनांनी या निर्णयाचे स्वागत केलेले आहे.
इतर बातम्या
Join Whatsapp Group