रशियाकसून तेल खरेदीमुळे अमेरिकेतून भारतावर प्रचंड दबाव टाकण्याचा आर्थिक नुकसान करण्याचा प्रयत्न होत असला तरी भारत अमेरिकेच्या दबावाला बळी पडला नाही. रशियाने देखील भारताला साथ दिली आहे. व्लादिमीर पुतिन सात मंत्री घेऊन भारत दाैऱ्यावर आले आणि त्यांनी अनेक महत्वाचे करार देखील भारतासोबत केले .
एका वरिष्ठ अधिकाऱ्याने पीटीआय या वृत्तसंस्थेला सांगितले आहे की, भारताने अभियांत्रिकी, औषधनिर्माण, कृषी आणि रसायनशास्त्र क्षेत्रांमधील तब्बल ३०० उत्पादने भारतीय निर्यातदारांना रशियन बाजारपेठेत पाठवायचे आहेत. ही एक महत्वाची आणि मोठी संधी नक्कीच आहे. भारत आणि रशियाकडून २०३० पर्यंत द्विपक्षीय व्यापार १०० अब्ज डॉलर्सपर्यंत वाढवण्यासाठी प्रयत्न केले जात आहेत.रशियाकडून होणारी आयात सातत्याने वाढत आहे. ही भारतासाठी नक्कीच चांगली बातमी आहे. पुतिन यांच्या भारत दाैऱ्यानंतर भारतातील निर्यातदार चांगलेच कामाला लागले आहेत.
अनेक प्रमुख क्षेत्रांमध्ये रशियाची आयातीची मागणी पूर्ण करण्यासाठी भारताचा पुरवठा वाढवण्याच्या उद्देशाने अनेक उच्च-क्षमतेच्या उत्पादनांची निवड केली आहे. पुतिन यांनी केलेल्या करारांनंतर भारताला कोणत्याही परिस्थितीमध्ये रशियातील निर्यात वाढवायची आहेत. अमेरिकेने ज्यावेळी भारतावर 50 टक्के टॅरिफ लावला, त्यावेळीच रशियाने स्पष्ट केले की, आम्ही आमच्या बाजारपेठेत भारताच्या वस्तूंचे मोठ्या प्रमाणात स्वागत करू.