हिंगोली : भरधाव कार रस्त्याच्या खाली असलेल्या झाडावर आदळल्याने हिंगोलीत नरसी मार्गावर भीषण अपघात झाल्याची मिळत आहे. या अपघातात महिलेसह दोघे ठार झाले आहेत.
याबत मिळालेल्या माहितीनुसार, हिंगोलीत शनिवारी नरसी मार्गावर भरधाव कार रस्त्याच्या खाली असलेल्या झाडाला आदळली. त्यानंतर झालेल्या अपघातात दोघे ठार झाले. तर तीन जण गंभीर जखमी झाले आहेत. अनिरुद्ध तानाजी वानखडे व अर्चना सुभाष वानखडे अशी अपघातातील मृतांची नावे आहेत.
छत्रपती संभाजीनगर येथून उमरखेडकडे जाताना हिंगोलीच्या नरसी जवळ हा अपघात झाला. या अपघातामधील तीन जणांची प्रकृती गंभीर आहे. त्यांना पुढील उपचारासाठी नांदेड येथे हलवले आहे.