शिवसेना आणि राष्ट्रवादी काँग्रेस आमदार अपात्र प्रकरणाची सुनावणी आता एकत्र होणार आहे. 3 स्पटेंबरला ही सुनावणी होणार आहे. अजित पवार गटाच्या 41 आमदारांना नोटीस जारी करण्यात आली. अनेक दिवसांपासून ही सुनावणी लांबली आहे.
दरम्यान ही सुनावणी झाल्यानंतर महाराष्ट्राच्या राजकारणात मोठा भूकंप होणार असल्याचा दावा करण्यात आला आहे. महाराष्ट्राच्या राजकारणात मोठा भूकंप होणार आहे आणि त्यानंतर सरकार जाणार असल्याचा दावा माजी खासदार चंद्रकांत खैरे यांनी केला आहे.
आमदार अपात्र सुनावणीत या वेळेस काही ना काही मोठा भूकंप होईल, असंही त्यांनी स्पष्ट केलं. आमच्या जिल्ह्यातले पाच जण फुटले त्यातले चार जण या 16 पैकी आहेत. शंभर टक्के मुख्यमंत्री महाविकास आघाडीचा होईल, आम्ही तर म्हणतोय की उद्धव ठाकरेच मुख्यमंत्री बनतील,“ असा विश्वास खैरे यांनी व्यक्त केला.
“मला जर उद्धव साहेबांनी सांगितलं गद्दारांना पाडण्यासाठी तुम्ही सक्षम आहात तर मी लढायला तयार आहे. मी पश्चिम मतदारसंघाचा पहिला हिंदू आमदार आहे. नंतर मग दिल्लीत 20 वर्षे गेलो. संजय शिरसाट कोण बोलणारा तो तर सत्ताधारी पक्षाचा प्रवक्ता आहे ना. सत्ताधारी पक्षाचे मुख्यमंत्री आणि दोन्ही उपमुख्यमंत्री मराठा आरक्षणाबाबत काही बोलत नाहीत म्हणून हे रोज भांडण चाललंय,“ असे खैरे म्हणाले.
“मी उद्धव साहेबांशी माझ्या इलेक्शनच अजून काही बोललो नाही, त्यांचा सर्वे होईल महाविकास आघाडी यावेळेस एक - एक उमेदवार निवडून आलाच पाहिजे अशा पद्धतीने उमेदवारी देईल,“ असे खैरे म्हणाले.