महाराष्ट्रातील सरकारला जनता जागा दाखवून देईल : संजय राऊत
महाराष्ट्रातील सरकारला जनता जागा दाखवून देईल : संजय राऊत
img
दैनिक भ्रमर

नाशिक (भ्रमर प्रतिनिधी) :- महाराष्ट्राचे विद्यमान सरकार हे चाटूगिरी करणारे सरकार असून ते काही पण करू शकते. पण येणार्‍या काळात जनता त्यांना योग्य ती जागा दाखवून देईल, असा इशारा देऊन उद्धव ठाकरे गट शिवसेना नेते खा. संजय राऊत यानी दिला. सब भूमी गोपाल की, त्याप्रमाणे सब भूमी ‘देवा’ की अशी परिस्थिती भाजपामध्ये झालेली असल्याचा टोलाही त्यांनी लगावला.

खा. संजय राऊत हे नाशिक दौरा आटोपून मुंबईला जाताना बोलत होते. नाशिक मुक्कामी नाशिकमधील शिवसेना नेते वसंत गिते, सुनील बागूल, जिल्हाप्रमुख सुधाकर बडगुजर, महानगरप्रमुख विलास शिंदे व अन्य नेत्यांशी चर्चा केली.

मुंबईला रवाना होण्यापूर्वी प्रसारमाध्यमांशी बोलताना संजय राऊत यांनी भाजपचे प्रदेशाध्यक्ष चंद्रशेखर बावनकुळे यांच्या संस्थेला देण्यात आलेल्या भूखंडाबाबत टीका करताना म्हटले आहे, की सब भूमी गोपाल की तसं सब भूमी ‘देवा’ की अशी परिस्थिती आहे. त्यामुळे भाजप काही पण करू शकतो. ज्या पद्धतीने भाजपचा कारभार चालला आहे, तो अतिशय चुकीचा असल्याचे मतदेखील त्यांनी यावेळी व्यक्त केले.

अमित शहा यांच्या नाशिक दौर्‍याबाबत बोलताना संजय राऊत म्हणाले, की ज्या अर्थी देशाच्या गृहमंत्र्यांना विभागवार बैठका घ्याव्या लागतात. त्याअर्थी भाजपची काय परिस्थिती आहे, येणार्‍या निवडणुकीत काय होणार आहे, याची चाहूल अमित शहा यांना लागली आहे. त्यामुळे आता निवडणुकीत काय होणार, हे स्पष्ट झाल्याचे सांगून खा. संजय राऊत म्हणाले, की ज्यावेळी मोदी आणि शहा महाराष्ट्राच्या दौर्‍यावर येतात, त्यावेळी राज्यातील मोठा उद्योग हा स्थलांतरित होतो. त्यामुळे नाशिककरांनी सावध राहावे, असा इशारादेखील त्यांनी यावेळी दिला.


इतर बातम्या
Join Whatsapp Group