बाबा सिद्दीकींच्या हत्येची जबाबदारी बिश्नोई गँगने घेतली,  सोशल मीडियावर पोस्ट करत कारणही सांगितलं
बाबा सिद्दीकींच्या हत्येची जबाबदारी बिश्नोई गँगने घेतली, सोशल मीडियावर पोस्ट करत कारणही सांगितलं
img
दैनिक भ्रमर
राष्ट्रवादी काँग्रेस अजित पवार गटाचे नेते बाबा सिद्दीकी यांची गोळी झाडून हत्या करण्यात आली.या घटनेमुळे मोठी  खळबळ माजली आहे. दरम्यान आता 
 बाबा सिद्दिकी यांच्या हत्या प्रकरणात आता एक मोठी अपडटे समोर आली आहे.  या प्रकरणात लॉरेन्स बिश्नोई गँगचा हात असल्याचा संशय पोलिसांना होता. त्यानंतर आता लॉरेन्स बिश्नोई गँगने या हत्येची जबाबदारी घेतली आहे. त्यासंबंधीत एक भलीमोठा पोस्ट त्यांनी सोशल मीडियावर केली आहे.

मीडिया रिपोर्टनुसार, बिश्नोई टोळीच्या फेसबुक पोस्टमध्ये सोशल मीडियावर केलेल्या पोस्टमध्ये बिश्नोई गँगने म्हटलं की, "ओम जय श्री राम, जय भारत, मला जीवनाचं सार समजतं आणि संपत्ती आणि शरीराला मी धूळ समजतो. मैत्रीच्या कर्तव्याचा सन्मान करत मी जे योग्य होतं तेच केले.

सलमान खान, आम्हाला हे युद्ध नको होतं. पण तुझ्यामुळे आमच्या भावाला जीव गमवावा लागला. आज बाबा सिद्दीकी यांचा शालीनपणाचा सागर संपला आहे किंवा एकेकाळी त्याच्यावर दाऊदसोबत मकोका होता. त्याच्या मृत्यूचे कारण म्हणजे त्याचे दाऊद आणि अनुज थापन यांच्यासोबत बॉलिवूड, राजकारण आणि मालमत्ता व्यवहाराशी असलेले संबंध.

आमचं कोणाशीही वैयक्तिक वैर नाही. मात्र, सलमान खान किंवा दाऊद टोळीला मदत करणारा जो कोणी असेल त्याने तयार राहावे. जर कोणी आमच्या भावांना मारले तर आम्ही त्याला प्रत्युत्तर देऊ. आम्ही कधीच पहिला वार करत नाही. जय श्री राम, जय भारत, शहीदांना विनम्र अभिवादन.

दरम्यान, बाबा सिद्दिकी यांच्या हत्येमागे एका बड्या गँगस्टरचा हात असल्याचा पोलिसांना आधीपासून संशय होता. यामागे सलमान खान गोळीबार कनेक्शन असून बिश्नोई गँगचा त्यामागे हात असल्याच्या दृष्टीने पोलिसांनी तपास सुरू केला. कुख्यात गँगस्टर लॉरेन्स बिश्नोई याने आता बाबा सिद्दिकी यांच्या हत्येची जबाबदारी घेतली आहे
इतर बातम्या
Join Whatsapp Group