उत्तर प्रदेशातालील कानपूर जिल्ह्यातील बिल्हौर तालुक्यातुन एक खळबळजनक घटना समोर आली आहे. एका कोंबड्यांच्या पोल्ट्री फार्ममध्ये अज्ञातांनी शिरुन ४०० हून अधिक कोंबड्यांना बांबूने मारुन त्यांना ठार केल्याचा धक्कादायक प्रकार उघडकीस आला आहे.
कानपुरच्या बिल्हौर तहसीलच्या गोहोलियापुर गावात शुक्रवारी रात्री उशीरा थरकाप उडविणारी ही घटना घडली. गावातील एका कोंबड्यांच्या फार्ममध्ये अचानक सामाजिक तत्वांनी हल्लाबोल करीत काटोरी तारांनी गुंडाळलेल्या बाबूंनी ४०० हून अधिक कोंबड्यांना निदर्यीपणे ठार मारल्याचे उघडकीस आले आहे.
ही घटना उघडकीस आल्यानंतर संपूर्ण परिसरात दहशत आणि संतापाचे वातावरण पसरले. पोलिसांनी तातडीने कारवाई करीत दोन आरोपींना अटक केली आहे. दोषींवर कठोर कारवाई करण्याची मागणी होत आहे.