महाराष्ट्रावरील वीज संकट आणखी गहिरं.., सातही औष्णिक विद्युत केंद्र तिसऱ्या दिवशीही प्रभावित
महाराष्ट्रावरील वीज संकट आणखी गहिरं.., सातही औष्णिक विद्युत केंद्र तिसऱ्या दिवशीही प्रभावित
img
Dipali Ghadwaje

अकोला : राज्यातील सातही औष्णिक विद्युत केंद्रातील वीजनिर्मिती सलग तिसऱ्या दिवशी प्रभावीत झाली आहे. त्यामुळे, राज्यातील वीज संकट वाढण्याची शक्यता आहे. सातही औष्णिक विद्युत केंद्रातून सध्या क्षमतेच्या 50 टक्केच वीजनिर्मिती केली जाणार आहे. पाऊस, ओला कोळसा आणि दुरुस्तींच्या कामामुळे सातही केंद्रातील वीजनिर्मिती प्रभावित झाली आहे. 9540 मेगॅव्हॅटची क्षमता असताना सध्या फक्त 4732 मेगाव्हॅट वीजनिर्मिती या औष्णिक विद्युत केंद्रातून केली जात आहे. त्यामुळे ऐन गणेशोत्सवात राज्यावर भारनियमनाची टांगती तलवार आहे. 

महाराष्ट्रात एकूण सात औष्णिक विद्युत केंद्र आहेत. या सात केंद्रावरुन राज्यासाठी विजनिर्मिती केली जाते. परंतु, आज सलग तिसऱ्या दिवशी या केंद्रांवरील वीजनिर्मिती प्रभावित झाल्यानं राज्यातील वीज संकट गहिरं होण्याची शक्यता आहे.

पाऊल, ओला कोळसा आणि दुरुस्तीची कामं खोळंबल्यानं या सातही वीजनिर्मिती केंद्रांच्या क्षमतेच्या केवळ 50 टक्केच वीजनिर्मिती सध्या सुरू आहे. आणखी काही दिवस असंच सुरू राहिलं तर मात्र, राज्याला भारनियमनाला सामोरं जावं लागू शकतं. 

 
केंद्र 
  क्षमता
निर्मिती
कोराडी
2190
1184
नाशिक
630
130
भुसावळ
1210726
पारस
500346
परळी
750414
खापरखेडा  
1340
819
चंद्रपूर   
2920
1114
एकूण
9540
4732


इतर बातम्या
Join Whatsapp Group