वायनाड मध्ये काँग्रेस पक्ष
वायनाड मध्ये काँग्रेस पक्ष "इतकी" घरे बांधणार; राहुल गांधींची मोठी घोषणा
img
दैनिक भ्रमर
केरळमधील वायनाडमध्ये भूस्खलन होऊन तब्बल ३४० पेक्षा जास्त लोकांचा मृत्यू झाला आहे. तर शेकडो लोक जखमी झाले आहेत. या भूस्खलनाच्या दुर्घटनेत अनेक घरं, जीव ढिगार्‍याखाली गाडले गेले.

या दुर्घटनेनंतर लोकसभेचे विरोधी पक्षनेते राहुल गांधी आणि काँग्रेस पक्षाच्या सरचिटणीस प्रियांका गांधी यांनी वायनाडला भेट देत भूस्खलनग्रस्तांशी संवाद साधला. या दौऱ्यादरम्यान राहुल गांधी यांनी भूस्खलनग्रस्तांसाठी मोठी घोषणा केली आहे. वायनाडमधील भूस्खलनग्रस्तांसाठी काँग्रेस १०० पेक्षा जास्त घरं बांधून देणार आहे.

ते म्हणाले की, आम्ही काल वायनाडमधील घटनास्थळी जाऊन भूस्खलन घडलेल्या भागाची पाहणी केली. तेथील परिस्थितीचं आकलन केलं. त्यानंतर प्रशासनाबरोबर बैठकही घेतली आहे. यावेळी प्रशासनाकडून आम्हाला या दुर्घटनेतील मृतांची संख्या आणि नुकसान झालेल्या घरांची संख्यांबाबत माहिती दिली. यावेळी आम्ही सांगितलं की, पक्षाकडून शक्य ती सर्व मदत केली जाईल. तसंच १०० पेक्षा जास्त घरं बांधण्यासाठी काँग्रेस कटिबद्ध आहे.

इतर बातम्या
Join Whatsapp Group