
५ मे २०२५
इस्लामाबाद : जम्मू-काश्मीरच्या पहलगाममध्ये २२ एप्रिल रोजी झालेल्या दहशतवादी हल्ल्यानंतर केंद्रातील मोदी सरकार ॲक्शन मोडमध्ये आलं आहे. भारत आणि पाकिस्तान या दोन देशांत तणाव वाढला आहे.
याचदरम्यान, आज सोमवारी पाकिस्तानमध्ये अचानक आलेल्या भूकंपामुळे तिथल्या नागरिकांमध्ये भीतीचं वातावरण निर्माण झालं आहे. दरम्यान, या भूकंपाची तीव्रता रिश्टर स्केलवर ४.२ एवढी मोजण्यात आलीय.
आज सोमवारी दुपारी ४ वाजता पाकिस्तानात ४.२ रिश्टर स्केलचा भूकंप झाल्याचं राष्ट्रीय भूकंप विज्ञान केंद्राने (एनसीएस) सांगितलं.
Copyright ©2025 Bhramar