जालन्यात मोकाट कुत्र्यांच्या हल्ल्यात 7 वर्षीय चिमुकलीचा मृत्यू झाल्याची घटना घडलीय. शहरातील गांधीनगर भागात ही घटना घडलीय. चिमुकली अंगणात खेळत असताना तिच्यावर तीन ते चार कुत्र्यांनी हल्ला करत तिचे लचके तोडले. यात चिमुकल्या संध्याचा दुर्दैवी मृत्यू झालाय. या घटनेमुळे परिसरात हळहळ व्यक्त केली जात आहे.
मिळालेल्या माहितीनुसार , संध्या प्रभुदास पाटोळे (वय 7 वर्ष) असं मयत मुलीचं नाव आहे. दरम्यान या घटनेनंतर आता जालना शहरातील मोकाट कुत्र्यांचा बंदोबस्त करावा अशी मागणी जोर धरत आहे.
चिमुकली घराबाहेरील मैदानावर खेळायला गेली आणि दहा मिनिटात भटक्या कुत्र्यांनी जीव घेतला शहरातील गांधीनगर परिसरामध्ये संध्या ही चिमुकली सकाळी सात वाजेच्या सुमारास घराबाहेर असलेल्या मैदानावर खेळण्यासाठी गेली.
खेळण्यासाठी गेल्यानंतर चार ते पाच भटक्या कुत्र्याने तिच्यावर जीवघेणा हल्ला केला आणि हल्ल्यामध्ये संध्या गंभीर जखमी झाली आणि नंतर उपचारासाठी दवाखान्यात नेल असता तिचा दुर्दैवी मृत्यू झाला आहे .
दरम्यान जालना शहरांमध्ये मोकाट कुत्र्यांचा बंदोबस्त करावा यासाठी विविध संघटनांनी आंदोलन केली मागणी केली मात्र महानगरपालिकेने भटक्या कुत्र्यासंदर्भात कोणतीही ठोस उपाययोजना न केल्यामुळे चिमुकलीचा दुर्देवी मृत्यू झाला आहे.या चिमुकलीच्या मृत्यूला जबाबदार कोण असा प्रश्न आता उपस्थित केला जात आहे.